हा ब्लॉग आणि पुढे तिचं एकूणच लेखन तरूणाई डोक्यावर घेईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. ’ब्लॉग सुरू केलाय- कसा वाटला ते सांगा’, असं तिने फक्त दोन जिवलग मैत्रिणींना सांगितलं होतं. अर्थात ’मी जे काही करते ते अगदी प्राणपणाने’ असं ती म्हणते. ’ती’ म्हणजे ’स्टे हंगरी स्टे फूलीश’ #StayHungryStayFoolish या ३ लाखांहून अधिक प्रतींचा खप असलेल्या, ८ भारतीय भाषांमधून अनुवाद झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाची लेखिका रश्मी बंसल. IIM अहमदाबाद मधून एमबीए झालेल्या २५ जणांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्या सोडून देऊन उद्योजक होण्याचा ध्यास घेतला. त्यांचा खाचखळग्यांनी भरलेला पण अद्भुत प्रवास मांडणारं हे पुस्तक. यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यातली ज्ञानपिपासा कायम प्रज्वलित असायला हवी, हा या पुस्तकातला मूलमंत्र. तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेली रश्मी स्वत: देखील IIM ची एमबीए आहे. सोशल मिडीया आणि http://youthcurry.blogspot.in/
आपण आवडीचं काम करताना, स्वैपाक करताना किंवा स्नान करताना गुणगुणतो ते काही कुणी आपला म्युझिक अल्बम काढणारेय म्हणून नाही. तुम्ही जे काही करता ते इतकं मनापासून असेल, त्यातला आनंद तुम्हाला गवसला असेल तर पुढचं सगळं आपोआप घडतं. ’द इंडिपेंडंट’ आणि टाईम्स मध्ये पत्रकारिता केलेल्या रश्मीने लेखन हीच आपली पॅशन असल्याचं ओळखलं. ’गॉड्स ओन किचन’ या ताज्या पुस्तकासह तिच्या इतर ६ पुस्तकांचा खप देखील तडाखेबंद आहे. JAM – #JustAnotherMagazine या प्रसिद्ध नियतकालिकाची ती प्रणेती आहे. या सार्यात ब्लॉगवरील ताज्या लेखांची संख्या रोडावत चालली असली तरी एकूण ब्लॉग्जची संख्या आणि गुणवत्ता जबरदस्त आहे.
एका उद्योजक स्त्रीच्या वाटेत येणारे काचेरी अडसर केव्हाच भेदून पलीकडे गेलेल्या रश्मीची ब्लॉगवरच्या विषयांची निवड तिचा प्रचंड आवाका दाखवणारी आणि अवाक करणारी आहे. उद्योगक्षेत्रातल्या चालू घडामोडींवर दृष्टीक्षेप आहे. करियरबद्दल टिप्स आहेत. पालकत्व आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य़ आहे. प्रवासवर्णनं आहेत. लोकप्रिय परदेशी आणि देशी टीव्ही शो, नामांकित हिंदी-इंग्लीश चित्रपट, गाजलेली पुस्तकं या सार्यांचं परिक्षण यात आहे. बहुतेक लेख आटोपशीर, मोबाईलच्या एका स्क्रीनवर मावणारे कारण रश्मीचं कॉर्पोरेट गणित अगदी पक्कं आहे.
एका उद्योजक स्त्रीच्या वाटेत येणारे काचेरी अडसर केव्हाच भेदून पलीकडे गेलेल्या रश्मीची ब्लॉगवरच्या विषयांची निवड तिचा प्रचंड आवाका दाखवणारी आणि अवाक करणारी आहे. उद्योगक्षेत्रातल्या चालू घडामोडींवर दृष्टीक्षेप आहे. करियरबद्दल टिप्स आहेत. पालकत्व आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य़ आहे. प्रवासवर्णनं आहेत. लोकप्रिय परदेशी आणि देशी टीव्ही शो, नामांकित हिंदी-इंग्लीश चित्रपट, गाजलेली पुस्तकं या सार्यांचं परिक्षण यात आहे. बहुतेक लेख आटोपशीर, मोबाईलच्या एका स्क्रीनवर मावणारे कारण रश्मीचं कॉर्पोरेट गणित अगदी पक्कं आहे.
इंजिनीयर झालेल्या वा होऊ घातलेल्या तमाम मुलींनी ’बन्नो तेरा बी-टेक लागे सेक्सी’ हा रश्मीचा लेख अवश्य वाचावा. एनआरआय मुलगा पटकवायला सोपं जावं म्हणून, समाजात पत वाढविण्यासाठी, केवळ करियर करण्य़ासाठी की इतर पदवीधरांपेक्षा वेगळी तांत्रिक समज आणि उंची गाठावी म्हणून! नक्की कशासाठी आपण ही पदवी घेत आहोत याचं आत्मपरिक्षण केलं तरच करिअरच्या गगनाला गवसणी घालता येते हे रश्मी या लेखात सडेतोड पण खुसखुशीत शब्दात सांगते.
बर्याच लेखातून तिचे बी-स्कूल चे अनुभव समोर येतात. केबीसी शो मागचं अर्थकारण ती मांडते. पदव्या खिरापतीसारख्या वाटणार्या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढताना ती पदवीपलीकडच्या जीवनशिक्षणावर भर देत लिहिते, "कायम पहिलं येणं म्हणजेच यश नव्हे. दुसरं येणं ही त्याआधीची महत्वाची पायरी आहे हे समजून घेऊन पुढच्या संधीसाठी तुम्ही स्वत:ला अधिक सक्षम करणार की नाही!". मास्टरशेफ या मूळ ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रमाचं उदाहरण या संदर्भात देत ती लिहिते," सामान्यांना त्यांच्यातलं असामान्यत्व शोधायला उद्युक्त करणं हे या शो चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. मर्यादित साधनांमध्ये, ठराविक वेळेत ध्येय गाठण्यासाठी ज्या विजीगिषु पद्धतीने स्पर्धक आव्हान स्वीकारतात, चुकतात, थकतात, पुन्हा प्रयत्न करतात, धडपडतात आणि अंतिमत: खोलवर लपलेला आत्मविश्वास खेचून बाहेर काढतात तो आत्मशोधाचा क्षण म्हणजेच परिपूर्ती नाही का! मग तुम्ही ती स्पर्धा जिंकता की नाही हे तितकसं महत्वाचं नाही. तुम्ही जिंकलेलेच असता. यशस्वी व्हायचं तर पदव्या आणि प्रमाणपत्राच्या पलीकडे जाऊन आयुष्यात काय काय करायला लागतं त्याची ही एक सुरेख झलक आहे."
बर्याच लेखातून तिचे बी-स्कूल चे अनुभव समोर येतात. केबीसी शो मागचं अर्थकारण ती मांडते. पदव्या खिरापतीसारख्या वाटणार्या शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढताना ती पदवीपलीकडच्या जीवनशिक्षणावर भर देत लिहिते, "कायम पहिलं येणं म्हणजेच यश नव्हे. दुसरं येणं ही त्याआधीची महत्वाची पायरी आहे हे समजून घेऊन पुढच्या संधीसाठी तुम्ही स्वत:ला अधिक सक्षम करणार की नाही!". मास्टरशेफ या मूळ ऑस्ट्रेलियन टीव्ही कार्यक्रमाचं उदाहरण या संदर्भात देत ती लिहिते," सामान्यांना त्यांच्यातलं असामान्यत्व शोधायला उद्युक्त करणं हे या शो चं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. मर्यादित साधनांमध्ये, ठराविक वेळेत ध्येय गाठण्यासाठी ज्या विजीगिषु पद्धतीने स्पर्धक आव्हान स्वीकारतात, चुकतात, थकतात, पुन्हा प्रयत्न करतात, धडपडतात आणि अंतिमत: खोलवर लपलेला आत्मविश्वास खेचून बाहेर काढतात तो आत्मशोधाचा क्षण म्हणजेच परिपूर्ती नाही का! मग तुम्ही ती स्पर्धा जिंकता की नाही हे तितकसं महत्वाचं नाही. तुम्ही जिंकलेलेच असता. यशस्वी व्हायचं तर पदव्या आणि प्रमाणपत्राच्या पलीकडे जाऊन आयुष्यात काय काय करायला लागतं त्याची ही एक सुरेख झलक आहे."
फ्लिपकार्ट #Flipkart आणि मैंत्रा या कंपन्या मर्ज झाल्या. दोन्ही कंपन्यांचे मालक बंसलच. या पार्श्वभूमीवर आऊटलुकसाठी लिहिलेला ’बी फॉर बफे, बी फॉर बंसल’ हा तिचा लेख धमाल आहे. विशेषत: नवलेखकांनी तिच्या पुस्तकांच्या जन्मकथा वाचायलाच हव्यात. तिची पुस्तक परिक्षणे म्हणजे ’व्यामिश्र अनुभूती’ टाईप शब्दातली समीक्षा नसून गप्पाटप्पा आहेत. ती ओड टू इंडिया हे विडंबन काव्य लिहिते. नेमक्या शब्दात प्रवासाबद्दल लिहिते. उदा: केरळ काय चीज आहे हे तिच्या या ४ ओळीतून कळतं. "इतकं सुंदर आणि स्वच्छ बॅकवॉटर, मग स्थानिक लोक त्यांचा कचरा कुठे बरं टाकत असावेत. आपण उर्वरित प्लास्टिकबॅग प्रेमी भारतीय चार बर्या गोष्टी केरळकडून आजवर का शिकलो नाही?, केळं वाफवून, काचर्या तळून किंवा परतून कसंही खा. उत्तम लागतं, केरळ म्हणजे सोनं, सोनं, आणखी सोनं, केरळमधल्या बसेसना काचेच्या खिडक्या नाहीत! सदानकदा आंदोलन करणार्यांनी त्या शिल्लक ठेवल्या नसाव्यात."
एनसीपीए ला पाहिलेल्या वुडहाऊसच्या पात्रांवरचं नाटक, लिलेट दुबे, नसीरुद्दीन शाह सारख्यांची चर्चेतली नाटकं याबरोबरच स्पॉटलाईट, लिंकन, शेफ असे बरेच हॉलिवूड सिनेमे किंवा दंगल, भाग मिल्खा भाग या सारखे भारतीय मातीतले चित्रपट, अशा कितीतरी कलाकृतींवर इथे झकास लेख आहेत. रश्मी म्हणते, "भारतीय प्रेक्षकांना स्वयंप्रकाशी काजव्यासारख्या सत्यापेक्षा त्याचं भव्यदिव्य सादरीकरण जास्त भावतं. ’कहानी मे ट्विस्ट’ तर असलाच पाहिजे. मग मुळात अंतिम शर्यतीत कधीही मागे वळून बिळून न पाहिलेल्या मिल्खा सिंगला त्याची हार सुद्धा ’हटके’ वाटावी म्हणून पडद्यावर तसं करावं लागतं. मेरी कोमच्या बॉक्सींग विश्वस्पर्धेच्या वेळी प्रत्यक्षात घराच्या अंगणात मजेत बागडणार्या तिच्या मुलाला, पडद्यावर मात्र त्याची आई जगज्जेतेपदासाठी झुंज देत असताना कंपल्सरी गंभीर आजारी पडून प्राणांशी झुंज द्यावी लागते. काय सांगता यापेक्षा कसं सांगता हेच मह्त्वाचे." पुढे रश्मी मिस्कीलपणे लिहिते," मलाही कधी कधी माझ्या पुस्तकातल्या लहान मोठ्य़ा उद्योजकांना थेट सुपरमॅन बनवून टाकावसं वाटतं. पण मंडळी कल्पनाराज्यातला विहार अल्पजीवी असतो. स्वत:ची जमीन निर्माण करून त्यावर स्वत:ची मोहोर उमटवण्यातलं थ्रील उमगणं हे खरं जगणं."
रश्मी मोकळेपणाने सांगते," मी मध्यमवर्गातून आले आहे. मध्यमवर्ग म्हणजे मूल्य जपणं, चौकटीत जगणं आणि जपून खर्च. आज माझी राहणी तितकीशी साधी नाही. जीवनमान बदललय. मला भरपूर पैसा हवा आहे पण तो योग्य तिथेच खर्च व्हावा याचं भान मला आहे कारण मूल्यबैठक तीच आहे. मी आता एका नव्या मध्यमवर्गाची प्रतिनीधी आहे याचा मला अभिमान वाटतो."
रश्मी यशस्वी लोकांची उदाहरणं खूप देते पण उद्योगविश्वातल्या, आस्थापनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत आणि दर्जा तपासणीपासून विपणनापर्यंतच्या प्रवासात येणार्या दैनंदिन समस्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याबद्दल रश्मीच्या लेखनातून फार काही हाती लागत नाही असा आक्षेप तिचे टीकाकार घेतात. रश्मी त्यावर म्हणते, "हे अडथळे स्थळ-काळ-व्यक्तीपरत्वे बदलतात. तेव्हा दृष्टीकोन बदला. सकारात्मक व्हा. फक्त उद्याच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातमीत नाव झळकावं म्हणून धडपडण्यापेक्षा असं काही तरी करा की इतिहासातलं एक तरी पान तुमच्या नावे लिहिलं जाईल."
रश्मी यशस्वी लोकांची उदाहरणं खूप देते पण उद्योगविश्वातल्या, आस्थापनेपासून उत्पादन निर्मितीपर्यंत आणि दर्जा तपासणीपासून विपणनापर्यंतच्या प्रवासात येणार्या दैनंदिन समस्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याबद्दल रश्मीच्या लेखनातून फार काही हाती लागत नाही असा आक्षेप तिचे टीकाकार घेतात. रश्मी त्यावर म्हणते, "हे अडथळे स्थळ-काळ-व्यक्तीपरत्वे बदलतात. तेव्हा दृष्टीकोन बदला. सकारात्मक व्हा. फक्त उद्याच्या वर्तमानपत्रातल्या मुख्य बातमीत नाव झळकावं म्हणून धडपडण्यापेक्षा असं काही तरी करा की इतिहासातलं एक तरी पान तुमच्या नावे लिहिलं जाईल."
No comments:
Post a Comment