चेहर्यावरून स्कार्फ बांधलेली एक मुलगी बसस्टॉपवर उभी असते. बाईकवरून जाणारा एक पुरूष तिथे येऊन तिला म्हणतो " आती क्या खंडाला ?" त्यावर ती मुलगी उत्तरते " अहो पप्पा, मी आहे." हा बोचरा विनोद (!) सध्या प्रचलित आहे, पण त्याला एका कटू सामाजिक वास्तवाची धार आहे.
बहुतेक प्रत्येक महिलेला मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू वर्गातील असो वा अगदी तळागाळातील असो ,छेडछाड करणार्या पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा , शरम वाटावी अशा शेर्यांचा ,विखारी नजरांचा, हावभावांचा, विकृत स्पर्शाचा त्रास सहन करावा लागतो. हा ईव्ह टिझिंग किंवा महिलांची छेड काढण्याचा प्रकार समाजात सर्रास घडतो.एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बाजारात, बस स्टॉपवर, अगदी शाळा, कॉलेज किंवा ऑफीस मधे देखील गर्दीचा वा एकांताचा फायदा घेऊन स्त्रीचा विनयभंग केला जातो. अशा लैंगिक गैरवर्तनामुळे स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना तिच्या मनाला होतात. मुलगी जेव्हा तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा अशा घटनांमुळे तिच्या मनाची कुचंबणा होते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कमकुवत मनाच्या मुली मनातल्या मनात कुढत बसतात. अशा नकारात्मक अनुभवांमुळे स्त्रियांवर आत्मविश्वास गमावणे, सरसकट सगळ्याच पुरूषांकडे संशयी नजरेने पाहणे, कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे ,पुढील शिक्षण घेण्याची, करिअर करण्याची हिंमत खचणे असे खोलवर मानसिक परिणाम होऊ शकतात. भीती वा लाजेमुळे, अपमानित आणि विमनस्क मनस्थितीमुळे काही महिला आयुष्य संपवायच्या टोकाला देखील जातात.
सुदैवाने समाजात अजूनही चांगल्या पुरूषांचे प्रमाण जास्त आहे परंतु छेडछाडीतून विकृत आनंद मिळवणार्या पुरूषांचे प्रमाण वाढत चालले आहे. असे पुरूष समाजातल्या सगळ्या स्तरांमधले असतात. काही जण मूल्यशिक्षण, संस्कारांचा अभाव असलेल्या कुटुंबातून येतात, काही व्यसनाधीनतेतून नकळत अशा प्रकारांकडे वळतात. काही मानसिक वा लैंगिक विकृतीचे बळी असतात, कुणाला एखाद्या स्त्रीकडून वाईट अनुभव आला तर त्याचा बदला समस्त स्त्री जातीकडून घेण्याचा हा प्रयत्न असतो. लैंगिक गुन्हे घडण्यामागे माध्यमांचा परिणाम देखील कारणीभूत आहे. आयटम सॉंग म्हणून गाजलेली तथाकथित गाणी, द्वयर्थी जाहिराती आणि बाजारू चित्रपटांमधून "उपभोग्य वस्तू" अशी स्त्रीची प्रतिमा निर्माण होते. (यात सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करायला असणार्या स्त्रियांचाही दोष आहे) अश्लील साहित्य, इंटरनेटवरील पॉर्न साईटस आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे मनातली लैंगिक अस्वस्थता महिलांना त्रास देऊन व्यक्त केली जाते. चांगल्या घरांतील काही उच्चशिक्षीत पुरूष देखील कधी कधी मजा म्हणून किंवा सहज,कुणी बघत नाही म्हणून महिलांची छेड काढतात. महिलेने खाली मान घातली, ती घाबरली की अशा पुरूषांचा अहंकार सुखावतो. काहींना त्यातून मिळणारा विकृत आत्मविश्वास हवा असतो. काही तरूणांना मित्रांनी आपल्याला बावळट समजू नये म्हणून महिलांना छेडणे हा पुरूषार्थ सिद्ध करण्याचा एक सोपा मार्ग वाटतो. सिनेमामधील नायक ज्या नायिकेशी छेडछाड करतो पुढे तीच नायिका त्याच्या प्रेमात पडते या मसाला कथानकातून पौगंडावस्थेतील मुले काही वेगळाच धडा घेतात. आपल्याही आई, बहिणीवर अशी वेळ येऊ शकते याचा त्यांना विसर पडतो. अनेक सुसंस्कृत तरूणांना आपल्या महाविद्यालयात घडणार्या अशा घटनांची खंत वाटते पण ते एकट्याने विरोध करू शकत नाहीत. पुरुषप्रधान व्यवस्थेत अपवाद वगळता महिलांना बहुतांशी दुय्यमच वागणूक मिळते. तिच्यावर वचक ठेवण्याचे सर्वात सोपे हत्यार म्हणजे तिचे शील पण याचा अर्थ समाजाचा एक मोठा भाग आत्मसन्मान हरवलेल्या अवस्थेत जगतो आणि ही गंभीर गोष्ट आहे.
या गुन्ह्याविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा करण्याइतके सोपे नाही. भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे महिलेला लज्जा उत्पन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर. असे करताना कुणी पकडले गेलेच तर त्या महिलेनेच प्रोत्साहन दिले, असा खुशाल कांगावा केला जातो. मुंबईतील आंबोली भागात आपल्या मैत्रिणींच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या किनन सॅण्टोस आणि रुबेन फर्नांडिस या दोन तरुणांचा गुंडाच्या टोळक्याने भररस्त्यावर खून केला तेव्हा प्रचंड खळबळ माजली होती.बहुतेक केसेसमधे पोलीस यंत्रणेवर पुरेसा विश्वास नसल्याने अशा गुन्ह्याचा साक्षीदार मिळणं अवघड असतं. बलात्काराच्या केसमधे "डी.एन.ए" चाचणीद्वारे गुन्हा सिद्ध करता येतो. विनयभंग सिद्ध करणं पुराव्याअभावी अवघड होतं.
एखाद्या स्त्रीने अशी घटना घरी सांगितली तर रस्ता बदल, दुर्लक्ष कर असेच साधारण सुचविले जाते. ऍड.जाई वैद्य या तज्ञ असे निरीक्षण नोंदवतात "एखादीने मनाचा हिय्या करून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली तर फौजदारी कायद्यानुसार तिला जे प्रश्न विचारले जातात त्याची लाजीरवाणी उत्तरे देता देता तिचा धीर खचतो. छेड काढली म्हणजे नक्की काय केले हे सांगण्याइतकी हिंमत तक्रारदार महिलेजवळ असतेच असे नाही. यातून गुन्हा नोंदवला गेलाच तर संथ न्यायप्रक्रियेमुळे तिचे उरलेसुरले अवसान संपते. त्यापेक्षा अन्याय मुक पणाने सहन केलेला बरा असे तिला वाटते. मग असे गुन्हे एक तर नोंदले जात नाहीत, गेलेच तर दबावामुळे मधूनच केस मागे घेतली जाते. शिक्षेचे प्रमाण नगण्य असते." अर्थात याची दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की वैयक्तिक आकसापोटी एखादी स्त्री खोटा आरोप तर करत नाही ना! सगळ्याच स्त्रिया सभ्य, सुशील, सुसंस्कृत असतात असे नाही. अशा आरोपांमुळे एखाद्या सच्छील पुरूषाच्या प्रतिष्टेचा बळी जाऊ शकतो कारण समाजाची सहानुभूती साहजिकच त्या स्त्रीला मिळते. प्रेमप्रकरण अंगाशी येते आहे असे पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी जोडीदारावरच लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणार्या मुली देखील आढळतात. तरीही केवळ स्वार्थापोटी किंवा सूडाच्या भावनेपोटी स्वत:चे नाव नाहक चर्चेत आणणार्या अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अजून तरी कमी आहे.
पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी १०० हा दूरध्वनी क्रमांक आहे. महिलांसाठी १०३ ही हेल्पलाइन आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला दक्षता समिती असते. तरीही छेडछाड करणाऱ्यांना जरब बसावी या दृष्टीने कायद्यात सुधारणा व्हायला हवी. केवळ कायद्याचा अंकुश या गुन्ह्याला पूर्ण आळा घालू शकत नाही त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. इतिहासात देखील स्त्रियांच्या वेदनांना महात्मा फुले, महर्षी कर्वे प्रभृतींनी वाचा फोडली. त्यांचा वारसा जपणारा पुरूषवर्ग आजही समाजात आहे. अशा प्रश्नांवर उपाय शोधताना त्यांची मदत होऊ शकते. मुलींच्या मनात आत्मगौरवाची भावना जागवणे आणि मुलींनी अशा घटनांना विरोध करण्याचे धाडस दाखवले तर त्यांना पाठिंबा देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. छेडछाडीच्या बहुतेक घटना या तरुण मुलांकडून घडताना दिसतात त्यासाठी घराघरातून मुलांवर समानतेचे आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर करण्याचे संस्कार केले गेले पाहिजेत.
मुलींनी देखील आपले वर्तन, पेहराव, देहबोली अनुचित नाही ना याचा विचार केला पाहिजे. एकटयाने विरोध करणं शक्य नसेल तिथे संघटनेचं बळ कामी येऊ शकेल. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षांच्या युवा संघटना असतात. मुलींच्या पाठीशी अशा संघटना उभ्या राहिल्या तर छेडछाडीचे प्रकार कितीतरी पटीने कमी होतील. 'मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्युज' ही संस्था मुंबईत वेगवेगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेते. त्यात लिंगभेद, छेडछाड, स्त्री भ्रूण हत्या इ. विषयांवर त्यांचं प्रबोधन केलं जातं. "आती क्या खंडाला? " विचारणार्या तरूणांच्या मनावर "स्त्रियाही तुमच्यासारख्या माणूस आहेत आणि समाजात सुरक्षितपणे वावरण्याचा त्यांनाही अधिकार आहे. तो त्यांना मिळायलाच हवा" हे ठसवणं हा यामागचा उद्देश आहे. आता गरज आहे ती समाजाने, विशेषत: तरूणांनी या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची !
बहुतेक प्रत्येक महिलेला मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू वर्गातील असो वा अगदी तळागाळातील असो ,छेडछाड करणार्या पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा , शरम वाटावी अशा शेर्यांचा ,विखारी नजरांचा, हावभावांचा, विकृत स्पर्शाचा त्रास सहन करावा लागतो. हा ईव्ह टिझिंग किंवा महिलांची छेड काढण्याचा प्रकार समाजात सर्रास घडतो.एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बाजारात, बस स्टॉपवर, अगदी शाळा, कॉलेज किंवा ऑफीस मधे देखील गर्दीचा वा एकांताचा फायदा घेऊन स्त्रीचा विनयभंग केला जातो. अशा लैंगिक गैरवर्तनामुळे स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेदना तिच्या मनाला होतात. मुलगी जेव्हा तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा अशा घटनांमुळे तिच्या मनाची कुचंबणा होते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कमकुवत मनाच्या मुली मनातल्या मनात कुढत बसतात. अशा नकारात्मक अनुभवांमुळे स्त्रियांवर आत्मविश्वास गमावणे, सरसकट सगळ्याच पुरूषांकडे संशयी नजरेने पाहणे, कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे ,पुढील शिक्षण घेण्याची, करिअर करण्याची हिंमत खचणे असे खोलवर मानसिक परिणाम होऊ शकतात. भीती वा लाजेमुळे, अपमानित आणि विमनस्क मनस्थितीमुळे काही महिला आयुष्य संपवायच्या टोकाला देखील जातात.
सुदैवाने समाजात अजूनही चांगल्या पुरूषांचे प्रमाण जास्त आहे परंतु छेडछाडीतून विकृत आनंद मिळवणार्या पुरूषांचे प्रमाण वाढत चालले आहे. असे पुरूष समाजातल्या सगळ्या स्तरांमधले असतात. काही जण मूल्यशिक्षण, संस्कारांचा अभाव असलेल्या कुटुंबातून येतात, काही व्यसनाधीनतेतून नकळत अशा प्रकारांकडे वळतात. काही मानसिक वा लैंगिक विकृतीचे बळी असतात, कुणाला एखाद्या स्त्रीकडून वाईट अनुभव आला तर त्याचा बदला समस्त स्त्री जातीकडून घेण्याचा हा प्रयत्न असतो. लैंगिक गुन्हे घडण्यामागे माध्यमांचा परिणाम देखील कारणीभूत आहे. आयटम सॉंग म्हणून गाजलेली तथाकथित गाणी, द्वयर्थी जाहिराती आणि बाजारू चित्रपटांमधून "उपभोग्य वस्तू" अशी स्त्रीची प्रतिमा निर्माण होते. (यात सवंग प्रसिद्धीसाठी काहीही करायला असणार्या स्त्रियांचाही दोष आहे) अश्लील साहित्य, इंटरनेटवरील पॉर्न साईटस आणि लैंगिक शिक्षणाचा अभाव यामुळे मनातली लैंगिक अस्वस्थता महिलांना त्रास देऊन व्यक्त केली जाते. चांगल्या घरांतील काही उच्चशिक्षीत पुरूष देखील कधी कधी मजा म्हणून किंवा सहज,कुणी बघत नाही म्हणून महिलांची छेड काढतात. महिलेने खाली मान घातली, ती घाबरली की अशा पुरूषांचा अहंकार सुखावतो. काहींना त्यातून मिळणारा विकृत आत्मविश्वास हवा असतो. काही तरूणांना मित्रांनी आपल्याला बावळट समजू नये म्हणून महिलांना छेडणे हा पुरूषार्थ सिद्ध करण्याचा एक सोपा मार्ग वाटतो. सिनेमामधील नायक ज्या नायिकेशी छेडछाड करतो पुढे तीच नायिका त्याच्या प्रेमात पडते या मसाला कथानकातून पौगंडावस्थेतील मुले काही वेगळाच धडा घेतात. आपल्याही आई, बहिणीवर अशी वेळ येऊ शकते याचा त्यांना विसर पडतो. अनेक सुसंस्कृत तरूणांना आपल्या महाविद्यालयात घडणार्या अशा घटनांची खंत वाटते पण ते एकट्याने विरोध करू शकत नाहीत. पुरुषप्रधान व्यवस्थेत अपवाद वगळता महिलांना बहुतांशी दुय्यमच वागणूक मिळते. तिच्यावर वचक ठेवण्याचे सर्वात सोपे हत्यार म्हणजे तिचे शील पण याचा अर्थ समाजाचा एक मोठा भाग आत्मसन्मान हरवलेल्या अवस्थेत जगतो आणि ही गंभीर गोष्ट आहे.
या गुन्ह्याविरूद्ध आवाज उठवणे हा गुन्हा करण्याइतके सोपे नाही. भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे महिलेला लज्जा उत्पन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर. असे करताना कुणी पकडले गेलेच तर त्या महिलेनेच प्रोत्साहन दिले, असा खुशाल कांगावा केला जातो. मुंबईतील आंबोली भागात आपल्या मैत्रिणींच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या किनन सॅण्टोस आणि रुबेन फर्नांडिस या दोन तरुणांचा गुंडाच्या टोळक्याने भररस्त्यावर खून केला तेव्हा प्रचंड खळबळ माजली होती.बहुतेक केसेसमधे पोलीस यंत्रणेवर पुरेसा विश्वास नसल्याने अशा गुन्ह्याचा साक्षीदार मिळणं अवघड असतं. बलात्काराच्या केसमधे "डी.एन.ए" चाचणीद्वारे गुन्हा सिद्ध करता येतो. विनयभंग सिद्ध करणं पुराव्याअभावी अवघड होतं.
एखाद्या स्त्रीने अशी घटना घरी सांगितली तर रस्ता बदल, दुर्लक्ष कर असेच साधारण सुचविले जाते. ऍड.जाई वैद्य या तज्ञ असे निरीक्षण नोंदवतात "एखादीने मनाचा हिय्या करून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदविली तर फौजदारी कायद्यानुसार तिला जे प्रश्न विचारले जातात त्याची लाजीरवाणी उत्तरे देता देता तिचा धीर खचतो. छेड काढली म्हणजे नक्की काय केले हे सांगण्याइतकी हिंमत तक्रारदार महिलेजवळ असतेच असे नाही. यातून गुन्हा नोंदवला गेलाच तर संथ न्यायप्रक्रियेमुळे तिचे उरलेसुरले अवसान संपते. त्यापेक्षा अन्याय मुक पणाने सहन केलेला बरा असे तिला वाटते. मग असे गुन्हे एक तर नोंदले जात नाहीत, गेलेच तर दबावामुळे मधूनच केस मागे घेतली जाते. शिक्षेचे प्रमाण नगण्य असते." अर्थात याची दुसरी बाजु अशीही विचारात घेतली पाहिजे की वैयक्तिक आकसापोटी एखादी स्त्री खोटा आरोप तर करत नाही ना! सगळ्याच स्त्रिया सभ्य, सुशील, सुसंस्कृत असतात असे नाही. अशा आरोपांमुळे एखाद्या सच्छील पुरूषाच्या प्रतिष्टेचा बळी जाऊ शकतो कारण समाजाची सहानुभूती साहजिकच त्या स्त्रीला मिळते. प्रेमप्रकरण अंगाशी येते आहे असे पाहून स्वत:ला वाचवण्यासाठी जोडीदारावरच लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणार्या मुली देखील आढळतात. तरीही केवळ स्वार्थापोटी किंवा सूडाच्या भावनेपोटी स्वत:चे नाव नाहक चर्चेत आणणार्या अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अजून तरी कमी आहे.
पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी १०० हा दूरध्वनी क्रमांक आहे. महिलांसाठी १०३ ही हेल्पलाइन आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला दक्षता समिती असते. तरीही छेडछाड करणाऱ्यांना जरब बसावी या दृष्टीने कायद्यात सुधारणा व्हायला हवी. केवळ कायद्याचा अंकुश या गुन्ह्याला पूर्ण आळा घालू शकत नाही त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. इतिहासात देखील स्त्रियांच्या वेदनांना महात्मा फुले, महर्षी कर्वे प्रभृतींनी वाचा फोडली. त्यांचा वारसा जपणारा पुरूषवर्ग आजही समाजात आहे. अशा प्रश्नांवर उपाय शोधताना त्यांची मदत होऊ शकते. मुलींच्या मनात आत्मगौरवाची भावना जागवणे आणि मुलींनी अशा घटनांना विरोध करण्याचे धाडस दाखवले तर त्यांना पाठिंबा देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. छेडछाडीच्या बहुतेक घटना या तरुण मुलांकडून घडताना दिसतात त्यासाठी घराघरातून मुलांवर समानतेचे आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर करण्याचे संस्कार केले गेले पाहिजेत.
मुलींनी देखील आपले वर्तन, पेहराव, देहबोली अनुचित नाही ना याचा विचार केला पाहिजे. एकटयाने विरोध करणं शक्य नसेल तिथे संघटनेचं बळ कामी येऊ शकेल. जवळपास प्रत्येक राजकीय पक्षांच्या युवा संघटना असतात. मुलींच्या पाठीशी अशा संघटना उभ्या राहिल्या तर छेडछाडीचे प्रकार कितीतरी पटीने कमी होतील. 'मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अॅब्युज' ही संस्था मुंबईत वेगवेगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेते. त्यात लिंगभेद, छेडछाड, स्त्री भ्रूण हत्या इ. विषयांवर त्यांचं प्रबोधन केलं जातं. "आती क्या खंडाला? " विचारणार्या तरूणांच्या मनावर "स्त्रियाही तुमच्यासारख्या माणूस आहेत आणि समाजात सुरक्षितपणे वावरण्याचा त्यांनाही अधिकार आहे. तो त्यांना मिळायलाच हवा" हे ठसवणं हा यामागचा उद्देश आहे. आता गरज आहे ती समाजाने, विशेषत: तरूणांनी या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची !