परवा चित्रपटगृहात समोरच्या रांगेत एक तरूण फौज येऊन बसली. बहुतेकांनी चेहरा रूमालाने झाकला होता जणू तो त्यांच्या पोशाखाचाच एक भाग होता. चित्रपट सुरू होताच त्यांनी रूमाल बाजूला केले.. तेव्हा त्या कॉलेजकन्यका असल्याचा उलगडा झाला. आजूबाजूला काही ’जोड्याही’ येऊन बसल्या होत्या,त्यांचे रूमाल मात्र त्यांच्या चेहर्यावर तसेच होते. त्वचेचे संरक्षण हा साहजिकच त्या ’पडद्या’मागचा हेतू नव्हता. जगातील काही देश बुरखाबंदीसाठी चर्चा, वादविवाद करत असताना या मंडळींनी स्वेच्छेने हा ’बुरखा’ स्वीकारला आहे. धार्मिक कारणासाठी किंवा ऊन-वार्यापासून संरक्षण हा हेतू असेल तर अजिबात हरकत नाही पण काही मुलींना टवाळखोर मुलांपासून बचाव करण्यासाठी चेहरा झाकावा लागतो तर काही जण जगापासून आपले कृत्य दडवण्यासाठी रूमालाचा आडोसा वापरतात... ही मात्र समाजासाठी चिंतेची बाब आहे.
खरं तर पोशाख आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपण एखादया व्यक्तीला भेटल्यावर आपले त्या व्यक्तीबद्दल जे मत तयार होत असते ते त्या व्यक्तीचा पोशाख /पेहराव हयावरूनच. मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुलींनी/स्त्रियांनी काय घालावे हे मात्र समाज ठरवत असतो. परदेशी स्त्रियांनी भारतात प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील वेबसाईटवर स्पष्ट सूचना आहेत "Women travellers in India should pay attention to local dress code for two reasons: to avoid sexual harassment and to avoid looking disrespectful" एका हिंदी सिनेमातील एक प्रसंग आठवतोय. तोकड्या कपड्यातली झीनत अमान एका सडकछाप मजनूला पकडून पोलीस अधिकारी असलेल्या अमिताभ बच्चनकडे घेऊन येते आणि तिला बघून त्या मजनूने शीटी वाजवली अशी तक्रार करते. यावर अमिताभ तिला सुनावतो "तुला अशा पोशाखात बघून लोक शीटी नाही तर काय देवळातली घंटा वाजवतील काय!" प्रेक्षक यावर मनापासून हसतात. म्हणजे असा पोशाख घातलेल्या मुलीला असाच प्रतिसाद मिळणार यात काही वावगं वाटत नाही. विद्यार्थिनींचे आखूड स्कर्ट हा सध्या ब्रिटनमधील शाळांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. शाळांनी मिनी स्कर्ट्सवर बंदी आणून ट्राउझर्स घालणे सक्तीचे केले आहे. ही समस्या एकट्या ब्रिटनमधील नाही . अमेरिका आणि युरोपीय देशांतही हा प्रश्न गंभीर बनला आहे . पण ' मिनी स्कर्ट्सवर बंदी ' हे त्याचे नेमके उत्तर नव्हे . शाळांच्या व्यवस्थापनांचा तसा दावाही नाही . एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर शोधलेल्या उपायांपैकी हा एक छोटासा प्रयत्न आहे , असे त्यांचे म्हणणे आहे . आपल्या देशातही अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ड्रेसकोड हा वादाचा विषय झाला आहे . तो लागू झाल्यानंतर शिक्षणसंस्थांची डोकेदुखी थोडी तरी कमी झाली असावी असे वाटते.
विद्यार्थी विश्वासाठी हे रास्त आहे कारण शरीराबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना अस्वस्थ करत असते. परंतु कॅनडातील एका पोलीस अधिकार्याने मध्यंतरी ’आपल्यावरील अत्याचार टाळायचे असतील तर स्त्रियांनी सभ्य कपडे घालावेत’ असे विधान केले. या मानसिकतेला उत्तर म्हणून आणि ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच ,त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा मूर्ख स्त्रियांनी त्या मोर्चात मुद्दाम वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला, साहजिक त्या मोर्चाने समाजाला योग्य तो बोध न मिळता ’बेशरम मोर्चा’ म्हणून त्याची संभावना झाली. सामाजिक संकेतांपेक्षा वेगळा पोशाख करणे याचा अर्थ आमंत्रण देणे असा होतो हे नाईलाजाने स्वीकारुन त्यामुळे स्त्रीवरील अत्याचारांची शक्यता वाढू शकते हा वस्तुनिष्ठ विचार प्रत्येक सुजाण स्त्री करते पण मुळात हे प्रकरण ’संस्कृती सापेक्ष’ आहे. एकेकाळी पुण्य़ात सकच्छ की विकच्छ (पाचवारी साडी/ नऊवारी साडी) हा वाद रंगला होता. केरळ राज्यात तर काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी उत्तरीय वापरणे असभ्यपणाचे मानले जाई. यासाठी लढा देत कालांतराने उत्तरीय न वापरणॆ म्हणजे असभ्यपणा इथे आपण येऊन पोचलो आहोत, तर हा विचार अद्याप ज्या सामाजिक स्तरापर्यंत झिरपला नाही त्या आदिवासी समाजातील काही गटांमध्ये उत्तरीय आजही वापरले जात नाही. मग याला श्लील अश्लील परिमाण लावणारे आपण कोण? काळाच्या एका तुकड्यावर उभे राहून आपण हे कसं ठरवणार? आणि तो अधिकार आपल्याला दिला कुणी?
शिवाय स्त्रियांबाबत दुर्दैवी घटना केवळ त्या त्या काळानुसार किंवा सामाजिक चौकटीनुसार अनुचित मानल्या गेलेल्या पोशाखामुळे घडतात असे नाही कारण विकृतीला वय, नाते, रूप, रंग कळत नाही. तरूणीच नव्हे बालिका, नात्यातील गरजू परित्यक्त वृद्ध स्त्रिया, अगदी रस्त्यावरील बेवारस, मतीमंद स्त्रियांवर देखील अत्याचार होतात. पण मुलींच्या विनयभंगाचे किंवा बलात्काराचे प्रकार जेव्हा समाजात घडतात तेव्हा सर्वात आधी मुलींच्या कपड्यांविषयी , त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात .म्हणजे मुलांवर समाजस्वास्थ्याची काहीच जबाबदारी नसते का! त्यांनी ’सिक्स पॅक्स’ दाखवत फिरणे अयोग्य मानले जात नाही, त्यांच्या ड्रेसकोड बद्दल कुणाला आक्षेप नाही पण स्त्रियांच्या पेहरावाकडे मात्र समाजातील स्वयंघोषित पोलिस डोळ्यात तेल घालून पाहणार, असे का!
आपण चांगले दिसावे, आकर्षणाचे केंद्र असावे असे बहुतेक प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाटते. स्त्रियांमधे ही भावना निसर्गत: अधिक प्रमाणात असते. पुरूषप्रधान समाजात या साध्या गोष्टीचा बाऊ केला जातो. उदा: एखाद्या पुरूषाची बायको निवर्तली तर त्याच्या राहणीत, पेहरावात फारसा फरक पडत नाही पण जोडीदार गमावलेल्या स्त्रीने चांगला पोशाख केला, दागिने घातले तर ती टीकेचा विषय ठरते आणि टीका करण्यात दुर्दैवाने इतर स्त्रियादेखील पुढे असतात. हे कितपत योग्य आहे!
पोशाख सभ्य असावा यात वादच नाही पण तो काय असावा हा मात्र वादाचा मुद्दा आहे. उदा: साडी हा भारतीय सभ्य पोशाख मानला जातो पण बर्याच चित्रपटांमधे साडीमधली ओलेती नायिका जे काय अंगविक्षेप करते किंवा सिनेमाचं जाऊ द्या ,काही स्त्रिया ज्या दिव्य तर्हेने साडी नेसतात ते पाहून साडीला सभ्य पोशाख म्हणायला जीभ रेटत नाही. त्यापेक्षा काही वेळा जीन्स वर व्यवस्थित टॉप हा देखील योग्य पोशाख असू शकतो. पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे सोयीचे आहे ना, ज्या समाजात आपण वावरतो तिथे तशा पोशाखाने काही औचित्यभंग तर होणार नाही ना एवढा विचार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य ते लैंगिक शिक्षण दिले गेले आणि मुळात स्त्रीकडे ’मादी’ म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून पाहण्याचा संस्कार रूजला तरच स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता मजबूत होईल. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोषाख आहे असं आपल्याच संस्कृतीत म्हटलं जातं. हे आपल्याला उमगलं, आंतरिक सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि व्यक्तीस्वातंत्र्य व स्वैराचार यामधली सीमारेषा आपल्याला नीट कळली तर अशा लेखाचे प्रयोजनच उरणार नाही..नाही का !
published in matrubhumi 10-11-11
खरं तर पोशाख आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपण एखादया व्यक्तीला भेटल्यावर आपले त्या व्यक्तीबद्दल जे मत तयार होत असते ते त्या व्यक्तीचा पोशाख /पेहराव हयावरूनच. मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुलींनी/स्त्रियांनी काय घालावे हे मात्र समाज ठरवत असतो. परदेशी स्त्रियांनी भारतात प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील वेबसाईटवर स्पष्ट सूचना आहेत "Women travellers in India should pay attention to local dress code for two reasons: to avoid sexual harassment and to avoid looking disrespectful" एका हिंदी सिनेमातील एक प्रसंग आठवतोय. तोकड्या कपड्यातली झीनत अमान एका सडकछाप मजनूला पकडून पोलीस अधिकारी असलेल्या अमिताभ बच्चनकडे घेऊन येते आणि तिला बघून त्या मजनूने शीटी वाजवली अशी तक्रार करते. यावर अमिताभ तिला सुनावतो "तुला अशा पोशाखात बघून लोक शीटी नाही तर काय देवळातली घंटा वाजवतील काय!" प्रेक्षक यावर मनापासून हसतात. म्हणजे असा पोशाख घातलेल्या मुलीला असाच प्रतिसाद मिळणार यात काही वावगं वाटत नाही. विद्यार्थिनींचे आखूड स्कर्ट हा सध्या ब्रिटनमधील शाळांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. शाळांनी मिनी स्कर्ट्सवर बंदी आणून ट्राउझर्स घालणे सक्तीचे केले आहे. ही समस्या एकट्या ब्रिटनमधील नाही . अमेरिका आणि युरोपीय देशांतही हा प्रश्न गंभीर बनला आहे . पण ' मिनी स्कर्ट्सवर बंदी ' हे त्याचे नेमके उत्तर नव्हे . शाळांच्या व्यवस्थापनांचा तसा दावाही नाही . एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर शोधलेल्या उपायांपैकी हा एक छोटासा प्रयत्न आहे , असे त्यांचे म्हणणे आहे . आपल्या देशातही अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ड्रेसकोड हा वादाचा विषय झाला आहे . तो लागू झाल्यानंतर शिक्षणसंस्थांची डोकेदुखी थोडी तरी कमी झाली असावी असे वाटते.
विद्यार्थी विश्वासाठी हे रास्त आहे कारण शरीराबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना अस्वस्थ करत असते. परंतु कॅनडातील एका पोलीस अधिकार्याने मध्यंतरी ’आपल्यावरील अत्याचार टाळायचे असतील तर स्त्रियांनी सभ्य कपडे घालावेत’ असे विधान केले. या मानसिकतेला उत्तर म्हणून आणि ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच ,त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा मूर्ख स्त्रियांनी त्या मोर्चात मुद्दाम वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला, साहजिक त्या मोर्चाने समाजाला योग्य तो बोध न मिळता ’बेशरम मोर्चा’ म्हणून त्याची संभावना झाली. सामाजिक संकेतांपेक्षा वेगळा पोशाख करणे याचा अर्थ आमंत्रण देणे असा होतो हे नाईलाजाने स्वीकारुन त्यामुळे स्त्रीवरील अत्याचारांची शक्यता वाढू शकते हा वस्तुनिष्ठ विचार प्रत्येक सुजाण स्त्री करते पण मुळात हे प्रकरण ’संस्कृती सापेक्ष’ आहे. एकेकाळी पुण्य़ात सकच्छ की विकच्छ (पाचवारी साडी/ नऊवारी साडी) हा वाद रंगला होता. केरळ राज्यात तर काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी उत्तरीय वापरणे असभ्यपणाचे मानले जाई. यासाठी लढा देत कालांतराने उत्तरीय न वापरणॆ म्हणजे असभ्यपणा इथे आपण येऊन पोचलो आहोत, तर हा विचार अद्याप ज्या सामाजिक स्तरापर्यंत झिरपला नाही त्या आदिवासी समाजातील काही गटांमध्ये उत्तरीय आजही वापरले जात नाही. मग याला श्लील अश्लील परिमाण लावणारे आपण कोण? काळाच्या एका तुकड्यावर उभे राहून आपण हे कसं ठरवणार? आणि तो अधिकार आपल्याला दिला कुणी?
शिवाय स्त्रियांबाबत दुर्दैवी घटना केवळ त्या त्या काळानुसार किंवा सामाजिक चौकटीनुसार अनुचित मानल्या गेलेल्या पोशाखामुळे घडतात असे नाही कारण विकृतीला वय, नाते, रूप, रंग कळत नाही. तरूणीच नव्हे बालिका, नात्यातील गरजू परित्यक्त वृद्ध स्त्रिया, अगदी रस्त्यावरील बेवारस, मतीमंद स्त्रियांवर देखील अत्याचार होतात. पण मुलींच्या विनयभंगाचे किंवा बलात्काराचे प्रकार जेव्हा समाजात घडतात तेव्हा सर्वात आधी मुलींच्या कपड्यांविषयी , त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात .म्हणजे मुलांवर समाजस्वास्थ्याची काहीच जबाबदारी नसते का! त्यांनी ’सिक्स पॅक्स’ दाखवत फिरणे अयोग्य मानले जात नाही, त्यांच्या ड्रेसकोड बद्दल कुणाला आक्षेप नाही पण स्त्रियांच्या पेहरावाकडे मात्र समाजातील स्वयंघोषित पोलिस डोळ्यात तेल घालून पाहणार, असे का!
आपण चांगले दिसावे, आकर्षणाचे केंद्र असावे असे बहुतेक प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाटते. स्त्रियांमधे ही भावना निसर्गत: अधिक प्रमाणात असते. पुरूषप्रधान समाजात या साध्या गोष्टीचा बाऊ केला जातो. उदा: एखाद्या पुरूषाची बायको निवर्तली तर त्याच्या राहणीत, पेहरावात फारसा फरक पडत नाही पण जोडीदार गमावलेल्या स्त्रीने चांगला पोशाख केला, दागिने घातले तर ती टीकेचा विषय ठरते आणि टीका करण्यात दुर्दैवाने इतर स्त्रियादेखील पुढे असतात. हे कितपत योग्य आहे!
पोशाख सभ्य असावा यात वादच नाही पण तो काय असावा हा मात्र वादाचा मुद्दा आहे. उदा: साडी हा भारतीय सभ्य पोशाख मानला जातो पण बर्याच चित्रपटांमधे साडीमधली ओलेती नायिका जे काय अंगविक्षेप करते किंवा सिनेमाचं जाऊ द्या ,काही स्त्रिया ज्या दिव्य तर्हेने साडी नेसतात ते पाहून साडीला सभ्य पोशाख म्हणायला जीभ रेटत नाही. त्यापेक्षा काही वेळा जीन्स वर व्यवस्थित टॉप हा देखील योग्य पोशाख असू शकतो. पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे सोयीचे आहे ना, ज्या समाजात आपण वावरतो तिथे तशा पोशाखाने काही औचित्यभंग तर होणार नाही ना एवढा विचार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य ते लैंगिक शिक्षण दिले गेले आणि मुळात स्त्रीकडे ’मादी’ म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून पाहण्याचा संस्कार रूजला तरच स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता मजबूत होईल. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोषाख आहे असं आपल्याच संस्कृतीत म्हटलं जातं. हे आपल्याला उमगलं, आंतरिक सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि व्यक्तीस्वातंत्र्य व स्वैराचार यामधली सीमारेषा आपल्याला नीट कळली तर अशा लेखाचे प्रयोजनच उरणार नाही..नाही का !
published in matrubhumi 10-11-11
No comments:
Post a Comment