वाल्या ते वाल्मिकी - चांगुलपणाच्या शोधाचा प्रवास
माणूस जन्मत:च चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. मात्र चुकांची कबुली देण्याचं धाडस त्याने दाखवलं तर आयुष्य त्याला आणखी एक संधी देऊ शकतं. बर्याचदा साधे सरळ जीवन जगणारे लोक क्षणिक उद्वेगात, रागाच्या भरात मोठी चूक करून बसतात आणि जन्मभरासाठी गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळी येतो. काही जण नशेमधे, काही जण आत्मसंरक्षणासाठी तर काही जण दबावामुळे असे काही कृत्य करतात ज्याचा त्यांना जन्मभर पश्चाताप करावा लागतो. शिक्षा भोगता भोगता त्यांच्यातले माणूसपण आतच विझू लागते. अट्टल गुन्हेगारांच्या संगतीत निर्ढावायच्या आत त्यांच्या आतल्या माणूसपणाला साद घालण्याचा प्रयत्न केला गेला तर तो प्रयत्न त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गुन्हेगाराला माणूस म्हणून पुन्हा एकदा जगण्याच्या प्रवाहात आणू शकतो.
"वाल्मिकी प्रतिभा" ही रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेली नाटिका, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला त्याची ही कथा. या नाटिकेत क्रूर डाकूंची एक टोळी जंगलात वास्तव्य करीत असते. प्रथेप्रमाणे देवीपुढे नरबळी देण्यासाठी हे डाकू जंगलात वाट चुकलेल्या एका चिमुकल्या मुलीला पकडून आणतात. मला मारू नका-मारू नका असे ती मुलगी आर्तपणे विनवू लागते पण डाकूंना धुंदी चढली असते. ते तिला बळी देणार इतक्यात त्या कोवळ्या मुलीचा करूण चेहरा पाहून, त्या डाकूंच्या सरदाराचे मन एकदम द्रवते, तलवार फेकून तो त्या मुलीला हृदयाशी धरतो. इतर डाकू हे पाहून संतापतात आणि सरदाराला बोल लावतात. परंतु त्या क्षणी हृदयपालट झालेला सरदार आमूलाग्र बदलतो..वाटमारीचा धंदा सोडून त्या बालिकेचा सांभाळ करू लागतो. सरस्वती देवी प्रकट होऊन त्याला म्हणते "मीच या बालिकेचे रूप घेऊन तुझी परिक्षा पाहिली व त्यात तू उत्तीर्ण झालास", एवढे बोलून आपली वीणा सरदाराच्या हाती सोपवून सरस्वती अंतर्धान पावते. नाटिका संपते.
या नाटिकेचा प्रयोग मध्यंतरी पुण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाला. त्याचे वेगळेपण म्हणजे यात भूमिका करणारे सगळे कलाकार कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी जेलमधले कैदी होते. या कैद्यांची राहायची-ने आण करण्याची व्यवस्था पुणे पोलिसांनी केली होती असा या बातमीत आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. यातील सरदाराची- मुख्य भूमिका करणारा कलाकार तर जवळपास १७ केसेसमधे अडकलेला गुंड. या कैद्यांना घेऊन ही नृत्यनाटिका बसवणार्या आलोकनंदा यांच्यामुळे या गुन्हेगाराचे मन:परिवर्तन झाले. ही नाटिका म्हणजे जणू त्याचीच कथा. एक मनस्वी व्यक्ती, एक उत्तम कलाकृती आणि त्या कलेचा गुन्हेगाराच्या हृदयातील मरू घातलेल्या भावनांना झालेला हळुवार स्पर्श, काय करामत करू शकतो त्याचेच हे उदाहरण!
मनाबरोबरच जीवनपरिवर्तनाचं उदाहरण ठरलेलं एक वृत्त येथे सांगायलाच हवं. चाळीतल्या मुलांबरोबर उनाडक्या करणार्या लक्ष्मण गोळेने वयाच्या १६व्या वर्षी भांडणातून एकावर वस्त-याने वार केला आणि तो तुरुंगात गेला. पुढे त्याच्यावर हाफ मर्डरसह जवळपास १९ गुन्हे दाखल झाले. घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. महात्मा गांधींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि तो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने हळूहळू स्वत:मध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. त्याची वर्तणूक पाहून त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगीही झाली. चांगलं बनण्याचा प्रयत्न केवळ समाजाच्या साथीने यशस्वी होऊ शकतो असं म्हणणारा लक्ष्मण "it's never too late" या उक्तीचा प्रत्यय देतो.
लक्ष्मण तर गुन्हेगार असून बदलला. मुळात आपली कायद्याची प्रक्रिया इतकी संथ आहे की गुन्हा सिद्ध न झालेले कित्येक आरोपी केवळ खटला प्रलंबित आहे म्हणून नाईलाजाने तुरूंगात खितपत पडलेले असतात. याचा अर्थ ते निर्दोषच असतात असा नसला तरी तुरूंगातील वातावरणात छोट्या गुन्हेगार्यांना अट्टल गुन्हेगारांकडून मोठ्या गुन्ह्यांचे जणू प्रशिक्षणच मिळत असते. यामुळे त्यांच्या सुधारणेच्या शक्यता मावळू लागतात. अर्थात हे सगळ्या गुन्हेगारांना लागू होत नाही. क्रौर्याची परिसीमा गाठणार्या कसाब सारख्या नराधम गुंडांच्या वर्तणूकीत पश्चातापाचा लवलेशही आढळत नाही, अशा खुनशी गुन्हेगारांना मानवाधिकाराच्या नावाखाली माणसात आणण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणाच नव्हे तर त्यांच्या अमानुषतेचे बळी ठरलेल्या निरपराध जीवांचा घोर अपमान आहे. मात्र माणूसपणाची धुगधुगी उरली आहे असे ज्या गुन्हेगारांच्या वर्तनातून जाणवते त्यांना शिक्षा करणार्या हातांऐवजी पुनर्वसन करणार्या हातांचा आधार मिळायला हवा. तरच त्यांना आयुष्यात नव्याने उभं राहता येईल.
१९९४ चा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या माजी महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी तिहार जेलचे रूपांतर तिहार आश्रमात करून हे सिद्ध करून दाखवले होते. पृथ्वीवरचा नरक म्हणावा अशा वातावरणातला, केवळ २५०० कैद्यांची क्षमता असूनही ८००० पेक्षा जास्त कैदी कोंबलेला तिहार तुरूंग अंमली पदार्थ, कमालीची अस्वच्छता, टोळीयुद्ध, माफिया कैद्यांचे साम्राज्य, हतबल अधिकारी आणि भ्रष्ट कर्मचारी यांच्या विळख्यात सापडला होता. किरण बेदींनी आधी कैद्यांशी सुसंवाद सुरू केला. तुरूंग पंचायत सुरू केली. ग्रंथालय सुरू केले, ध्यान-केंद्र सुरू केले, मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले, कैद्यांना पुढील शिक्षणाला प्रवृत्त करून मुक्त विद्यापीठाचे दालन सुरू केले, कैद्यांचे जीवनमान सुधारले. त्यांच्यातल्या माणसाला जागवले. किरण बेदींचे हे प्रयत्न कित्येक कैद्यांना नवजीवन देऊन गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तुरूंगाधिकार्यांनी या योजना राबवायला सुरूवात केली.
वाल्या ते वाल्मिकी हे दोन माणसांमधलं द्वंद्व नाही तर एकाच मनाचा अविष्कार असलेल्या दोन वृत्तींमधील द्वंद्व आहे. या द्वंद्वाची जाणीव होणे हीच माणसाच्या बदलण्याची सुरूवात असते मग तो माणूस आमूलाग्र बदलू शकतो. खरं तर परिवर्तन हा माणसाचा स्थायी भावच आहे. त्याचे प्रकट मन नकारात्मक विचार करत असते पण अप्रकट मनाची स्वत:ला बदलण्याची आस चांगुलपणाच्या पहिल्या पायरीवर त्याला घेऊन जाते. गरज आहे ती चांगलं बनण्याची त्याची धडपड समजून घेऊन समाजाने त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची.. त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट शोधायला मदत करण्याची. एखादी व्यक्ती, कला, पुस्तक, विचार, शैक्षणिक यश, शाबासकीची थाप, मायेचा शब्द... यापैकी कशातही हा टर्निंग पॉईंट दडलेला असू शकतो. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या एका संशोधनाने जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते पण आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून ते हादरले..बदलले.. इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल प्राईझ जगविख्यात आहे. तिहार तुरूंगातल्या एका सुशिक्षीत कैद्याचे हे शब्द किरण बेदी यांच्यावर लिहीलेल्या "आय डेअर" या पुस्तकात नोंदले गेले आहेत. तो आपल्या कैदी विद्यार्थ्यांना सांगत असे "भूतकाळात जे घडून गेले ते तुमच्या हातात नव्हते पण भविष्यकाळात तुमच्यातील माणुसकीच बाहेर यायला पाहिजे, तोच प्रयत्न आपण आता करायचा आहे".
माणूस जन्मत:च चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. मात्र चुकांची कबुली देण्याचं धाडस त्याने दाखवलं तर आयुष्य त्याला आणखी एक संधी देऊ शकतं. बर्याचदा साधे सरळ जीवन जगणारे लोक क्षणिक उद्वेगात, रागाच्या भरात मोठी चूक करून बसतात आणि जन्मभरासाठी गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळी येतो. काही जण नशेमधे, काही जण आत्मसंरक्षणासाठी तर काही जण दबावामुळे असे काही कृत्य करतात ज्याचा त्यांना जन्मभर पश्चाताप करावा लागतो. शिक्षा भोगता भोगता त्यांच्यातले माणूसपण आतच विझू लागते. अट्टल गुन्हेगारांच्या संगतीत निर्ढावायच्या आत त्यांच्या आतल्या माणूसपणाला साद घालण्याचा प्रयत्न केला गेला तर तो प्रयत्न त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गुन्हेगाराला माणूस म्हणून पुन्हा एकदा जगण्याच्या प्रवाहात आणू शकतो.
"वाल्मिकी प्रतिभा" ही रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेली नाटिका, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला त्याची ही कथा. या नाटिकेत क्रूर डाकूंची एक टोळी जंगलात वास्तव्य करीत असते. प्रथेप्रमाणे देवीपुढे नरबळी देण्यासाठी हे डाकू जंगलात वाट चुकलेल्या एका चिमुकल्या मुलीला पकडून आणतात. मला मारू नका-मारू नका असे ती मुलगी आर्तपणे विनवू लागते पण डाकूंना धुंदी चढली असते. ते तिला बळी देणार इतक्यात त्या कोवळ्या मुलीचा करूण चेहरा पाहून, त्या डाकूंच्या सरदाराचे मन एकदम द्रवते, तलवार फेकून तो त्या मुलीला हृदयाशी धरतो. इतर डाकू हे पाहून संतापतात आणि सरदाराला बोल लावतात. परंतु त्या क्षणी हृदयपालट झालेला सरदार आमूलाग्र बदलतो..वाटमारीचा धंदा सोडून त्या बालिकेचा सांभाळ करू लागतो. सरस्वती देवी प्रकट होऊन त्याला म्हणते "मीच या बालिकेचे रूप घेऊन तुझी परिक्षा पाहिली व त्यात तू उत्तीर्ण झालास", एवढे बोलून आपली वीणा सरदाराच्या हाती सोपवून सरस्वती अंतर्धान पावते. नाटिका संपते.
या नाटिकेचा प्रयोग मध्यंतरी पुण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाला. त्याचे वेगळेपण म्हणजे यात भूमिका करणारे सगळे कलाकार कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी जेलमधले कैदी होते. या कैद्यांची राहायची-ने आण करण्याची व्यवस्था पुणे पोलिसांनी केली होती असा या बातमीत आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. यातील सरदाराची- मुख्य भूमिका करणारा कलाकार तर जवळपास १७ केसेसमधे अडकलेला गुंड. या कैद्यांना घेऊन ही नृत्यनाटिका बसवणार्या आलोकनंदा यांच्यामुळे या गुन्हेगाराचे मन:परिवर्तन झाले. ही नाटिका म्हणजे जणू त्याचीच कथा. एक मनस्वी व्यक्ती, एक उत्तम कलाकृती आणि त्या कलेचा गुन्हेगाराच्या हृदयातील मरू घातलेल्या भावनांना झालेला हळुवार स्पर्श, काय करामत करू शकतो त्याचेच हे उदाहरण!
मनाबरोबरच जीवनपरिवर्तनाचं उदाहरण ठरलेलं एक वृत्त येथे सांगायलाच हवं. चाळीतल्या मुलांबरोबर उनाडक्या करणार्या लक्ष्मण गोळेने वयाच्या १६व्या वर्षी भांडणातून एकावर वस्त-याने वार केला आणि तो तुरुंगात गेला. पुढे त्याच्यावर हाफ मर्डरसह जवळपास १९ गुन्हे दाखल झाले. घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. महात्मा गांधींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि तो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने हळूहळू स्वत:मध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. त्याची वर्तणूक पाहून त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगीही झाली. चांगलं बनण्याचा प्रयत्न केवळ समाजाच्या साथीने यशस्वी होऊ शकतो असं म्हणणारा लक्ष्मण "it's never too late" या उक्तीचा प्रत्यय देतो.
लक्ष्मण तर गुन्हेगार असून बदलला. मुळात आपली कायद्याची प्रक्रिया इतकी संथ आहे की गुन्हा सिद्ध न झालेले कित्येक आरोपी केवळ खटला प्रलंबित आहे म्हणून नाईलाजाने तुरूंगात खितपत पडलेले असतात. याचा अर्थ ते निर्दोषच असतात असा नसला तरी तुरूंगातील वातावरणात छोट्या गुन्हेगार्यांना अट्टल गुन्हेगारांकडून मोठ्या गुन्ह्यांचे जणू प्रशिक्षणच मिळत असते. यामुळे त्यांच्या सुधारणेच्या शक्यता मावळू लागतात. अर्थात हे सगळ्या गुन्हेगारांना लागू होत नाही. क्रौर्याची परिसीमा गाठणार्या कसाब सारख्या नराधम गुंडांच्या वर्तणूकीत पश्चातापाचा लवलेशही आढळत नाही, अशा खुनशी गुन्हेगारांना मानवाधिकाराच्या नावाखाली माणसात आणण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणाच नव्हे तर त्यांच्या अमानुषतेचे बळी ठरलेल्या निरपराध जीवांचा घोर अपमान आहे. मात्र माणूसपणाची धुगधुगी उरली आहे असे ज्या गुन्हेगारांच्या वर्तनातून जाणवते त्यांना शिक्षा करणार्या हातांऐवजी पुनर्वसन करणार्या हातांचा आधार मिळायला हवा. तरच त्यांना आयुष्यात नव्याने उभं राहता येईल.
१९९४ चा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या माजी महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी तिहार जेलचे रूपांतर तिहार आश्रमात करून हे सिद्ध करून दाखवले होते. पृथ्वीवरचा नरक म्हणावा अशा वातावरणातला, केवळ २५०० कैद्यांची क्षमता असूनही ८००० पेक्षा जास्त कैदी कोंबलेला तिहार तुरूंग अंमली पदार्थ, कमालीची अस्वच्छता, टोळीयुद्ध, माफिया कैद्यांचे साम्राज्य, हतबल अधिकारी आणि भ्रष्ट कर्मचारी यांच्या विळख्यात सापडला होता. किरण बेदींनी आधी कैद्यांशी सुसंवाद सुरू केला. तुरूंग पंचायत सुरू केली. ग्रंथालय सुरू केले, ध्यान-केंद्र सुरू केले, मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले, कैद्यांना पुढील शिक्षणाला प्रवृत्त करून मुक्त विद्यापीठाचे दालन सुरू केले, कैद्यांचे जीवनमान सुधारले. त्यांच्यातल्या माणसाला जागवले. किरण बेदींचे हे प्रयत्न कित्येक कैद्यांना नवजीवन देऊन गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तुरूंगाधिकार्यांनी या योजना राबवायला सुरूवात केली.
वाल्या ते वाल्मिकी हे दोन माणसांमधलं द्वंद्व नाही तर एकाच मनाचा अविष्कार असलेल्या दोन वृत्तींमधील द्वंद्व आहे. या द्वंद्वाची जाणीव होणे हीच माणसाच्या बदलण्याची सुरूवात असते मग तो माणूस आमूलाग्र बदलू शकतो. खरं तर परिवर्तन हा माणसाचा स्थायी भावच आहे. त्याचे प्रकट मन नकारात्मक विचार करत असते पण अप्रकट मनाची स्वत:ला बदलण्याची आस चांगुलपणाच्या पहिल्या पायरीवर त्याला घेऊन जाते. गरज आहे ती चांगलं बनण्याची त्याची धडपड समजून घेऊन समाजाने त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची.. त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट शोधायला मदत करण्याची. एखादी व्यक्ती, कला, पुस्तक, विचार, शैक्षणिक यश, शाबासकीची थाप, मायेचा शब्द... यापैकी कशातही हा टर्निंग पॉईंट दडलेला असू शकतो. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या एका संशोधनाने जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते पण आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून ते हादरले..बदलले.. इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल प्राईझ जगविख्यात आहे. तिहार तुरूंगातल्या एका सुशिक्षीत कैद्याचे हे शब्द किरण बेदी यांच्यावर लिहीलेल्या "आय डेअर" या पुस्तकात नोंदले गेले आहेत. तो आपल्या कैदी विद्यार्थ्यांना सांगत असे "भूतकाळात जे घडून गेले ते तुमच्या हातात नव्हते पण भविष्यकाळात तुमच्यातील माणुसकीच बाहेर यायला पाहिजे, तोच प्रयत्न आपण आता करायचा आहे".