Published in Matrubhumi Thursday 20oct 2011
पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
देवळात गेल्यावर दानपेटीत एक तरी नाणं टाकल्याशिवाय आपल्याला देवदर्शनाचं समाधान मिळत नाही. एखादा धार्मिक उत्सव, सप्ताह असेल, देवळाचा जीर्णोद्धार असेल तर आपण फूल ना फुलाची पाकळी देऊन आपले धार्मिक कर्तव्य पार पाडतो. कधी कधी सोन्या, चांदी,हिर्याने आपल्या दैवताला मढवतो देखील .. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याचवेळी समाजातील दुर्लक्षितांना आर्थिक मदत करताना मात्र आपण हात आखडता का घेतो! असं नसतं तर आनंदवनासारख्या ’माणुसकीच्या तीर्थक्षेत्राला’ आर्थिक विवंचनेनं कधीच ग्रासलं नसतं. निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलविणारे, त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे बाबा आमटे यांचे आनंदवन आज आर्थिक संकटात आहे.
मदर तेरेसांच प्रसिद्ध वचन आहे, "समोर दिसणार्या जिवंत माणसावर जर आपण प्रेम करू शकत नसू तर अदृष्य परमेश्वरावर भक्तीरूपी प्रेम आपण कसे करणार!’
बाबा-साधनाताईंनी समाजातील अपंगांवर, व्याधीग्रस्तांवर फक्त प्रेमच केलं नाही तर त्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतला. कुष्ठरोगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही दूषित आहे. अगदी आधार कार्डाच्या नोंदणीचा देखील हक्क या बांधवांना झगडून मिळवावा लागतो यावरून त्यांचे एकूण आयुष्य सामान्य भारतीय नागरिकापेक्षा किती जिकीरीचे आहे याची कल्पना येते. बाबांचा लढा केवळ कुष्ठरोगाविरुद्ध नव्हता. जीवनात सगळी कुरूपता नष्ट व्हावी यासाठीच त्यांनी युद्ध आरंभिले होते. त्यांच्या वाटचालीत लक्षावधी उपेक्षितांच्या चेहर्यावर त्यांनी हास्य फुलवले. बाबा-साधनाताईंनी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कितीतरी प्रकल्प सुरू केले. डॉ. विकास आणि भारती तसेच डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांनी ती धुरा समर्थपणे वाहिली.. आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी डॉ.विकास यांनी सव्वाशेहून अधिक कुटिरोद्योगांची सुरूवात केली. कोलकात्यातून माशांची पिले आणून मत्स्यशेती सुरू केली, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड करवून घेतली. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंद्राद्वारे युवकांना रोजगार प्रशिक्षण मिळू लागले. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यात मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांच्या पर्यावरण संवर्धन केंद्रामुळे त्या परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत लक्षणीय प्रगती केली. याशिवाय आनंदवनात कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र, अंध-अपंग, कुष्ठरुग्ण यांच्या कलेचं ’स्वरानंदनवन' हे सादरीकरण यशस्वीरित्या काम करत आहेत.
बाबांची तिसरी पिढी- त्यांची तरूण नातवंडे उच्चशिक्षीत आहेत, शहरातील लखलखती दुनिया आणि लठ्ठ पगाराच्या नोकरीला न भुलता आमटे परिवाराचं स्वप्न मोठं करीत आहेत. दु:खाचा अंधार आजही आजूबाजूला सांडतच असतो, अशाच दु:खी आत्म्यांचा जत्था करून त्यांच्यावर सावली धरणारे बाबा आमटे आणि आता त्यांचा परिवार सूर्यप्रकाशाकडे तोंड करून आयुष्यभर उभे आहेत. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं पालकत्व पेलताना अनेक अडचणी समोर आहेत पण जिद्द अफाट आहे. ही केवळ पुनर्वसन केंद्रे नाहीत. अपंगांना समर्थ बनविण्याची आव्हाने यात आहेत. दु:ख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या त्या प्रार्थना आहेत.
कोणत्याही आश्रयार्थी व्याधीग्रस्ताला कधीही नाही म्हणायचे नाही हे आनंदवनाचे व्रत आहे त्यामुळे आनंदवनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची संख्या सतत वाढते आहे. प्रत्येक कुष्ठरुग्णामागे दर माणशी-दर दिवशी केवळ १५.५० रुपये एवढेच सरकारी अनुदान १२०० कुष्ठरुग्णांना मिळते. आजच्या गगनाला भिडणार्या महागाईत चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे, तिथे या विशाल परिवाराने तग कसा धरायचा. जगणे म्हणजे केवळ दोन वेळच्या अन्नाची, छप्पराची व कपडयाची सोय नाही तर निरंतर शिक्षण, मनुष्यत्वाचे सक्षमीकरण असायला हवे. पुनर्वसित इतर कुष्ठरुग्ण, अपंग, मूकबधिर, अंध अशा सर्वांचा विचार केल्यास आनंदवनाची लोकसंख्या अडीच हजारावर जाते. या सर्वांच्या किमान गरजा भागवणे जिकीरीचे होत आहे.
आजच्या स्वार्थी जगात समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणार्या, रचनात्मक कार्यातून परिवर्तन घडवून आणणार्या संस्थांची संख्या नाममात्र आहे. आर्थिक संकटामुळे आनंदवनाचे कार्य झाकोळून गेले तर स्वत:ला या समाजाचा संवेदनशील घटक मानणार्या प्रत्येकाच्या माणूसपणाची ती हार असेल. अशा संस्थांचे कार्य थांबले तर त्याबरोबर समाजातल्या चांगुलपणावरची आपली श्रद्धा संपून जाईल. आपल्यातील अनेकांना सेवाभावी कार्य करावेसे वाटते पण त्यासाठी आयुष्य उधळून देण्याची आमटे परिवारासारखी जिगर आपल्याकडे नसते. त्यांचे हात बळकट करणे मात्र आपल्याला अशक्य नाही. वंचितांबद्दल मनात केवळ करूणा असून उपयोगाचे नाही ,त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी करुणेस कृतीची जोड द्यायला हवी, असे बाबा नेहमी म्हणायचे. या प्रामाणिक प्रयत्नांना हातभार लावताना देणगीचा विनीयोग योग्य प्रकारेच केला जाईल याची दात्याला खात्री असते. "माणूस एक वेळ बोटांशिवाय जगू शकेल पण स्वाभिमानाशिवाय जगू शकणार नाही" असं बाबा आमटयांनी म्हटलं आहे. स्वाभिमान निर्माण होतो स्वावलंबनातून.. आजवर लाखो दुर्लक्षित बांधव संस्थेच्या उपक्रमांमुळे स्वबळावर उभे राहू शकले.
अशा प्रकल्पांचा पाया असणारा आर्थिक डोलारा सांभाळण्यातच सगळी उर्जा खर्च होण्यापेक्षा एक कायमस्वरूपी निधी जमा व्हावा व त्यातून अधिक जोमदारपणे काम करता यावं ,नवी आव्हाने पेलता यावी असा आनंदवनाचा मानस आहे. त्यातून दरवर्षी होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या १५०० वरून ९०००पर्यंत वाढवणे , अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या जमिनींवरील जल व मृद संधारणाचे कार्य वर्षाला १०० वरून १२०० कुटुंबांपर्यंत विस्तारणे, युवाग्राम प्रकल्पात बेरोजगारांना मिळणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ १०० हून पाचपटीने वाढविणे, स्थानिक पातळीवर होणाऱ्या वाषिर्क श्रमसंस्कांर छावणीस राज्यव्यापी छावण्यांचे स्वरूप देणे असे अनेक उपक्रम पूर्णत्वाला नेण्याचे आनंदवनाचे स्वप्न आहे. यासाठी ५५ कोटी रूपयांचा शाश्वत ’समाज प्रगती सहयोग निधी’ उभारणे आवश्यक आहे. यापैकी २७.५ कोटी एवढ्या निधीस दिल्या जाणाऱ्या योगदानाला इन्कम टॅक्स विभागाकडून कलम ३५ एसी/ ८० जीजीए(२)(बी)(बी) अंतर्गत १०० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु ३१ मार्च २०१२ पर्यंतच ही करसवलत लागू राहणार आहे. मदतीचे चेक महारोगी सेवा समिती, वरोरा या नावाने अपेक्षित आहेत. चेकच्या मागे आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी आणि पॅन चा उल्लेख आवश्यक आहे. आपण चेक या पत्त्यावर पाठवू शकता :
सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा जि. चंदपूर, महाराष्ट्र. पिन: ४४२९०७
याशिवाय ऑनलाईन बॅंकींग द्वारे अर्थसहाय्य करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क (०७१७६) २८२०३४ आणि ९०११०९४६२३
इ-मेल : vikasamte@anandwan.in
"पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू"
अशी साद घालणार्या आनंदवनाच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी केवळ हा निधी आवश्यक नाही, या निमित्त्याने सहृदयतेचा..माणुसकीचा.. वारसा जपल्याचे समाधान आपण मिळवू शकू.
पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
देवळात गेल्यावर दानपेटीत एक तरी नाणं टाकल्याशिवाय आपल्याला देवदर्शनाचं समाधान मिळत नाही. एखादा धार्मिक उत्सव, सप्ताह असेल, देवळाचा जीर्णोद्धार असेल तर आपण फूल ना फुलाची पाकळी देऊन आपले धार्मिक कर्तव्य पार पाडतो. कधी कधी सोन्या, चांदी,हिर्याने आपल्या दैवताला मढवतो देखील .. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याचवेळी समाजातील दुर्लक्षितांना आर्थिक मदत करताना मात्र आपण हात आखडता का घेतो! असं नसतं तर आनंदवनासारख्या ’माणुसकीच्या तीर्थक्षेत्राला’ आर्थिक विवंचनेनं कधीच ग्रासलं नसतं. निसर्गाने अन्याय केलेल्या व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलविणारे, त्यांच्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून जगण्याचे बळ देणारे बाबा आमटे यांचे आनंदवन आज आर्थिक संकटात आहे.
मदर तेरेसांच प्रसिद्ध वचन आहे, "समोर दिसणार्या जिवंत माणसावर जर आपण प्रेम करू शकत नसू तर अदृष्य परमेश्वरावर भक्तीरूपी प्रेम आपण कसे करणार!’
बाबा-साधनाताईंनी समाजातील अपंगांवर, व्याधीग्रस्तांवर फक्त प्रेमच केलं नाही तर त्यांच्या पुनर्वसनाचा वसा घेतला. कुष्ठरोगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही दूषित आहे. अगदी आधार कार्डाच्या नोंदणीचा देखील हक्क या बांधवांना झगडून मिळवावा लागतो यावरून त्यांचे एकूण आयुष्य सामान्य भारतीय नागरिकापेक्षा किती जिकीरीचे आहे याची कल्पना येते. बाबांचा लढा केवळ कुष्ठरोगाविरुद्ध नव्हता. जीवनात सगळी कुरूपता नष्ट व्हावी यासाठीच त्यांनी युद्ध आरंभिले होते. त्यांच्या वाटचालीत लक्षावधी उपेक्षितांच्या चेहर्यावर त्यांनी हास्य फुलवले. बाबा-साधनाताईंनी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कितीतरी प्रकल्प सुरू केले. डॉ. विकास आणि भारती तसेच डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांनी ती धुरा समर्थपणे वाहिली.. आनंदवनातील कुष्ठरोगी व अपंगांसाठी डॉ.विकास यांनी सव्वाशेहून अधिक कुटिरोद्योगांची सुरूवात केली. कोलकात्यातून माशांची पिले आणून मत्स्यशेती सुरू केली, चाराशेतीसाठी झाशीतील संस्थेकडून उच्च प्रथिनयुक्त गवतांच्या जातींची लागवड करवून घेतली. 'युवाग्राम' प्रशिक्षण केंद्राद्वारे युवकांना रोजगार प्रशिक्षण मिळू लागले. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी-जामणी तालुक्यात मुळगव्हाण गावी डॉ.विकास यांच्या पर्यावरण संवर्धन केंद्रामुळे त्या परिसरातील ४००हून अधिक शेतकरी कुटुंबांनी शेतीत लक्षणीय प्रगती केली. याशिवाय आनंदवनात कृत्रिम अवयव निर्मिती केंद्र, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र, अंध-अपंग, कुष्ठरुग्ण यांच्या कलेचं ’स्वरानंदनवन' हे सादरीकरण यशस्वीरित्या काम करत आहेत.
बाबांची तिसरी पिढी- त्यांची तरूण नातवंडे उच्चशिक्षीत आहेत, शहरातील लखलखती दुनिया आणि लठ्ठ पगाराच्या नोकरीला न भुलता आमटे परिवाराचं स्वप्न मोठं करीत आहेत. दु:खाचा अंधार आजही आजूबाजूला सांडतच असतो, अशाच दु:खी आत्म्यांचा जत्था करून त्यांच्यावर सावली धरणारे बाबा आमटे आणि आता त्यांचा परिवार सूर्यप्रकाशाकडे तोंड करून आयुष्यभर उभे आहेत. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं पालकत्व पेलताना अनेक अडचणी समोर आहेत पण जिद्द अफाट आहे. ही केवळ पुनर्वसन केंद्रे नाहीत. अपंगांना समर्थ बनविण्याची आव्हाने यात आहेत. दु:ख आणि दैन्य यांच्याशी लढे देण्याच्या त्या प्रार्थना आहेत.
कोणत्याही आश्रयार्थी व्याधीग्रस्ताला कधीही नाही म्हणायचे नाही हे आनंदवनाचे व्रत आहे त्यामुळे आनंदवनावर अवलंबून असणाऱ्या गरजूंची संख्या सतत वाढते आहे. प्रत्येक कुष्ठरुग्णामागे दर माणशी-दर दिवशी केवळ १५.५० रुपये एवढेच सरकारी अनुदान १२०० कुष्ठरुग्णांना मिळते. आजच्या गगनाला भिडणार्या महागाईत चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे, तिथे या विशाल परिवाराने तग कसा धरायचा. जगणे म्हणजे केवळ दोन वेळच्या अन्नाची, छप्पराची व कपडयाची सोय नाही तर निरंतर शिक्षण, मनुष्यत्वाचे सक्षमीकरण असायला हवे. पुनर्वसित इतर कुष्ठरुग्ण, अपंग, मूकबधिर, अंध अशा सर्वांचा विचार केल्यास आनंदवनाची लोकसंख्या अडीच हजारावर जाते. या सर्वांच्या किमान गरजा भागवणे जिकीरीचे होत आहे.
आजच्या स्वार्थी जगात समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणार्या, रचनात्मक कार्यातून परिवर्तन घडवून आणणार्या संस्थांची संख्या नाममात्र आहे. आर्थिक संकटामुळे आनंदवनाचे कार्य झाकोळून गेले तर स्वत:ला या समाजाचा संवेदनशील घटक मानणार्या प्रत्येकाच्या माणूसपणाची ती हार असेल. अशा संस्थांचे कार्य थांबले तर त्याबरोबर समाजातल्या चांगुलपणावरची आपली श्रद्धा संपून जाईल. आपल्यातील अनेकांना सेवाभावी कार्य करावेसे वाटते पण त्यासाठी आयुष्य उधळून देण्याची आमटे परिवारासारखी जिगर आपल्याकडे नसते. त्यांचे हात बळकट करणे मात्र आपल्याला अशक्य नाही. वंचितांबद्दल मनात केवळ करूणा असून उपयोगाचे नाही ,त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी करुणेस कृतीची जोड द्यायला हवी, असे बाबा नेहमी म्हणायचे. या प्रामाणिक प्रयत्नांना हातभार लावताना देणगीचा विनीयोग योग्य प्रकारेच केला जाईल याची दात्याला खात्री असते. "माणूस एक वेळ बोटांशिवाय जगू शकेल पण स्वाभिमानाशिवाय जगू शकणार नाही" असं बाबा आमटयांनी म्हटलं आहे. स्वाभिमान निर्माण होतो स्वावलंबनातून.. आजवर लाखो दुर्लक्षित बांधव संस्थेच्या उपक्रमांमुळे स्वबळावर उभे राहू शकले.
अशा प्रकल्पांचा पाया असणारा आर्थिक डोलारा सांभाळण्यातच सगळी उर्जा खर्च होण्यापेक्षा एक कायमस्वरूपी निधी जमा व्हावा व त्यातून अधिक जोमदारपणे काम करता यावं ,नवी आव्हाने पेलता यावी असा आनंदवनाचा मानस आहे. त्यातून दरवर्षी होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांची संख्या १५०० वरून ९०००पर्यंत वाढवणे , अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या जमिनींवरील जल व मृद संधारणाचे कार्य वर्षाला १०० वरून १२०० कुटुंबांपर्यंत विस्तारणे, युवाग्राम प्रकल्पात बेरोजगारांना मिळणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ १०० हून पाचपटीने वाढविणे, स्थानिक पातळीवर होणाऱ्या वाषिर्क श्रमसंस्कांर छावणीस राज्यव्यापी छावण्यांचे स्वरूप देणे असे अनेक उपक्रम पूर्णत्वाला नेण्याचे आनंदवनाचे स्वप्न आहे. यासाठी ५५ कोटी रूपयांचा शाश्वत ’समाज प्रगती सहयोग निधी’ उभारणे आवश्यक आहे. यापैकी २७.५ कोटी एवढ्या निधीस दिल्या जाणाऱ्या योगदानाला इन्कम टॅक्स विभागाकडून कलम ३५ एसी/ ८० जीजीए(२)(बी)(बी) अंतर्गत १०० टक्के सूट देण्यात आली आहे. परंतु ३१ मार्च २०१२ पर्यंतच ही करसवलत लागू राहणार आहे. मदतीचे चेक महारोगी सेवा समिती, वरोरा या नावाने अपेक्षित आहेत. चेकच्या मागे आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी आणि पॅन चा उल्लेख आवश्यक आहे. आपण चेक या पत्त्यावर पाठवू शकता :
सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा जि. चंदपूर, महाराष्ट्र. पिन: ४४२९०७
याशिवाय ऑनलाईन बॅंकींग द्वारे अर्थसहाय्य करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क (०७१७६) २८२०३४ आणि ९०११०९४६२३
इ-मेल : vikasamte@anandwan.in
"पांगळयाच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू"
अशी साद घालणार्या आनंदवनाच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी केवळ हा निधी आवश्यक नाही, या निमित्त्याने सहृदयतेचा..माणुसकीचा.. वारसा जपल्याचे समाधान आपण मिळवू शकू.