Friday, July 15, 2022

Time

Time

It's in a haste.. always

It does wish to halt for a moment though..

to feel it's own existence


Then it hurriedly hides itself in the clouds

but gets restless n wanders desperately...

It dives deep in the sea

and the next moment 

emerges on it's surface as an impulsive tidal wave...


It settles on a lush green leaf 

as a dew drop...

then the bubble bursts

With the blink of an eye


It starves for ages in despair in an empty bowl..

The careless time...Tramples a kitten rudely on the

crowdy streets 

When it's giant wheel rotates

anonymous lives get literally ragged into pieces


It's aloof, neutral.. endears none

Where does it head to !

It doesn't wait for breastfeeded lips 

nor does it wait to pass over the skin ,over the hair

even over the heart..callously


It travels on and on and never returns

Does it really exist ?


Time.. everlasting ..Full of life...

When it's all over for one

It's just a beginning for the other...

When it pauses for us 

Is that a termination ! 

It's not...

We keep flowing 

With the wind 

with the dust 

with the light...


Then what does time mean to us ?

Just a little span of our existence...

Which ends 

With our senses 

with us.


(काळ या कवितेचा अनुवाद)

- Mohini Limaye Modak

----------------------------

 काळ?

अखंड सुरू असते त्याची लगबग

त्यालाही थांबायच असतं क्षणभर खरंतर

अनुभवायचं असतं त्याचं असलेपण


मग तो ढगात लपतो,पण भांबावून सैरैवैरा होतो.

समुद्राच्या खोल तळाशी जातो तर

उद्वीग्न लाट होउन आदळत येतो

बसतो हिरव्यागार पानावर

टप्पोरा थेंब होऊन कधीतरी थांबतो

तर त्याचा बुडबुडा फुटतो


भुकेल्या कटो-यात तडफडून अर्धमेला होतो

बेफिकीरीने कधी 

भररस्त्यात मांजरीच्या पिल्लाला तुडवून जातो

कधी फिरतात अफाट त्याची चाकं

आणि भरगर्दीत कुणी चिंध्या चिंध्या होतं


तो अलिप्त, तो तटस्थ, त्याला कुठलाच मोह नसतो

कुठे पोहचायचय त्याला?

थांबत नाही तो, दुधकोवळ्या ओठांसाठी

तो जातो त्वचेवरुन... केसांवरून....

ह्रदयावरून सुद्धा?

जातो फक्त! येत का नाही?.


काळ खरच असतो?

काळ अखंड जिवंत!  तरूण!

एकासाठी संपलेला असतांना

दुस-यासाठी दौडत असतो !

तो आपल्यासाठी थांबतो

म्हणजे का नष्ट होतो आपण?

आपण तर वहात राहतो

वा-याबरोबर ,धुळीत, प्रकाशात अखंड...


मग काळ खरच कोण असतो ?

की आपण आपल्यापुरता एक काळ असतो?

जो आपल्या सोबत संपतो.


- ऍड. मंदाकिनी पाटील


–--------


Wednesday, June 29, 2022

आयआयटी_बीआयटी : Book Review


 #पुस्तक_परिचय आयआयटी_बीआयटी #महाराष्ट्र_टाइम्स

IIT मधून इंजिनियर होणं काय असतं , मुळात इंजिनियर होणं म्हणजे काय याविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणारं, IIT बॉम्बे (पवई) ची सहल घडवत तिथल्या अतरंगी प्रेरणादायी घडामोडींच वर्णन करणारं
सुकन्या पाटील या टॉपर IITean ने लिहिलेलं रंजक पुस्तक.

नंदन नीलकेणी, रोहिणी गोडबोले, सुधींद्र कुळकर्णी, अच्युत गोडबोले, ओला कॅब्जचे भाविश अग्रवाल तसेच दिवंगत नेते मनोहर पर्रीकर ही नावे आपल्या अगदी ओळखीची आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रात या सगळ्यांनी उत्तुंग झेप घेतलेली आहे. या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे ही व्यक्तिमत्वे घडली आहेत आयआयटी बॉम्बे (पवई) मधून. तांत्रिक शिक्षणासाठी आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, जगभरात नावाजली गेलेली महत्त्वाची संस्था आहे हे विदित आहे. पण केवळ कुशल अभियंत्यांची फौज तयार करणे इतकेच या संस्थेचे संकुचित ध्येय नाही.
मग ’आयआयटी बॉम्बे’ हे प्रकरण नेमके आहे तरी काय !
तिथून बाहेर पडताना जग बदलून टाकण्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या अभियंत्यांना अशी कोणती उर्जा ही संस्था देते, याचे उत्तर ’आयआयटी बीआयटी’ या पुस्तकात मिळते.
याच संस्थेच्या मुशीतून घडलेली, दोन सुवर्ण आणि एका रजतपदकासह आयआयटी बॉम्बेतील (पवई) सर्वोच्च मानाचे समजले जाणारे ’इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ पटकावणारी जळगावची सुकन्या पाटील या पुस्तकाची लेखिका आहे.
सध्या ’मायक्रोसॉफ्ट’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असलेली सुकन्या ही ग्रामीण भागातून पुढे आलेली, मराठी माध्यमातून शिकलेली, बुद्धीमान, विचारी, निसर्गप्रेमी आणि मिनिमलिस्टीक तरुणी. साहजिकच ती पुस्तक लिहिते तेव्हा ते फक्त ’आयआयटी मध्ये प्रवेश कसा मिळवावा’ किंवा ’जेईईची तयारी कशी करावी’ हे सांगणारे गाईड नसते. आयआयटी म्हणजे ’ग्लोबल संधी’, आयआयटी म्हणजे गलेलठ्ठ पॅकेज, आयआयटी म्हणजे ’लाईफ बन गयी’ अशी प्रतिमा असल्याने तिथे प्रवेश मिळवणे ही अनेक भारतीय विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा असते. या ध्येयाने पछाडलेल्यांवर ’कोटा फॅक्टरी’ सारख्या वेबमालिका देखील तयार केल्या गेल्या आहेत.
प्रचंड प्रयत्न करूनही थोडक्यात संधी हुकली तर निराशेच्या गर्तेत जाणार्यांची संख्याही कमी नाही. मुळात प्रवेश परिक्षा देणार्यांपैकी किती मुले ’इंजिनीअर होणे’ म्हणजे काय हे आधी समजून घेतात!
सकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा भरला आहे.
नकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा सरला आहे.
हाडाचा इंजिनीयर म्हणतो - एकंदरीत पेला गरजेपेक्षा दुप्पट आकाराचा आहे.
लॅटिनमध्ये इंजिनिअम म्हणजे नैसर्गिक क्षमता, गुणवत्ता. नैसर्गिक संसाधनांचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा कल्पक वापर करून अवघड समस्या सोडवणे, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी साकार करणे म्हणजे इंजिनीअरींग. अशी वस्तुनिष्ठ ’व्हिजन’ ठेवून ’इंजिनीअर’ होणे, त्यातूनही ’आयआयटी’ तून इंजिनीअर होणे याचे वेगळेपण सहजतेने सांगत होतकरुंना या क्षेत्राविषयी स्वच्छ नजर देणार्या वाटाड्याचे काम सुकन्याचे ’आयआयटी बीआयटी’ हे पुस्तक करते.
’थ्री इडिय़ट’ सारख्या चित्रपटातून नव्या पिढीच्या ’पॅशन’चे महत्व पालकांना समजावण्यात आले आहे. ’तुमची स्वप्ने मुलांवर लादू नका, त्यांना त्यांची स्वप्ने पाहू द्या’ वगैरे त्यांना हल्ली सतत सांगितले जाते आहे. प्रत्यक्षात पॅशनला स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पकता, सामान्य ज्ञान आणि विवेक यांची जोड असेल तरच ती परिपूर्ण बुद्धीमत्ता. अन्यथा नुसत्या स्वप्नांना अर्थ नसतो. इथे आयआयटी बॉम्बे सारखी संस्था मह्त्वाची ठरते कारण तिथे या सगळ्या पैलूंची मशागत होते. यासाठी आयआयटी उत्प्रेरकाचे काम कसे करते, तिथे शिक्षण घेण्य़ाकडे किती वेगवेगळ्या पद्धतींनी पाहिले जाते याची खुमासदार उदाहरणेही या पुस्तकात लेखिका देते.
’मला तिथे माझे स्वत्व गवसले’ असे लेखिका म्हणत असली तरी हे तिचे आत्मचरित्र वगैरे नाही. ती या पुस्तकातून ’आयआयटी बॉम्बे’ची सहल घडवून आणते. तिथला निसर्गरम्य परिसर, वैविध्यपूर्ण होस्टेल लाईफ, तिथल्या कला, क्रीडा, तांत्रिक, उद्योजकीय, सांस्कृतिक घडामोडी इ. विषयी सांगते. आत्मविश्वास वाढवणारा इंग्लीश लर्निंग प्रोग्राम, उद्यमशीलतेचे धडे देणारा ऑन्त्रप्रेन्युअर सेल, तंत्रक्षेत्राची क्षितीजे रुंदावणारा टेकफेस्ट, व्यवस्थापन कौशल्याची कार्यशाळा म्हणावा असा प्रसिद्ध ’मूड इंडिगो’ यांसारख्या भन्नाट उपक्रमांची माहिती देते. लॉजिकल रिझनिंग, स्ट्रक्चर्ड थिंकिंग ही कौशल्य इथे कशी विकसित होतात याविषयीही ती रंजक पद्धतीने सांगते.
एका बाजूला इंजिनिअर होण्याची आणि दुसर्या बाजूला माणूस म्हणून घडण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया हे अंगभूत वैशिष्ट्य असलेल्या ’आयआयटी बॉम्बे’च्या पार्श्वभूमीवर लिहिलेले हे पुस्तक. ते विद्यार्थ्यांची जाण तर वाढवतेच पण आपल्या पाल्याच्या इंजिनियरिंगच्या पदवीच्या कागदाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना नवे भान देते.
मराठीत या स्वरुपाचे आणि अशा विषयावरचे हे बहुधा एकमेव पुस्तक आहे.
पूर्वप्रकाशित : #मटा नागपूर edition 29 जून

Friday, June 10, 2022

दोन माणसांचा गुळांबा


म्हणजे काय! दोन माणसांपुरता? एवढाच करायचा तर इतका कुटाणा कशाला, असं तुम्हाला वाटत असेल. तर ते तसं नाही.

ही #गुळांबा कसा करावा याची रेसिपी नसून न-रेसिपी आहे. 🫢
ये उन दिनोंकी बात है जेव्हा उन्हाळी वाळवणं किंवा विशेष पदार्थ अजूनही सासूबाईच करत असत.
एका उन्हाळ्यात त्या परगावी गेल्यानं यंदाच्या गुळांब्याचं काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहिला.
आपण अत्यंत हुशार असून ’त्यात काय मोठंसं’ असं मी स्वत:ला सांगितलं आणि सासूबाईंना सर्प्राईज द्यायचं ठरवलं.
सुरुवातीच्या दिवसात असले झटके बहुतेक सगळ्याच नवविवाहितांना येत असतात 😁 तर ते असो.
तेव्हा फेसबुक वगैरे नसल्याने एका रविवारी मी घरातलं मंगला बर्वेंचं ’अन्नपूर्णा’ पुस्तक बाहेर काढून त्याबरहुकूम सगळी तयारी केली.
सगळे त्यात दिल्याप्रमाणे केले.
पितळी पातेल्यात रटरटणार्या त्या सोनेरी तांबूस गुळांब्याकडे बघताना कैरी किसताना हाताला थोडंस लागल्याचं दु:ख विरून गेलं.
दरम्यान सासूबाईंचा फोन (अर्थात ट्रिंग ट्रिंग वाला) आला.
हा विषय वगळून मी त्यांच्याशी बोलत बसले.
मध्येच पळत येऊन डावाने ढवळून गुळांब्याची कन्सीस्टन्सी तपासून गेले.
अजून तरी तो सैल वाटत होता.
फोन सुरुच राहिला, गुळांबा सैल वाटत राहिला.
फोन संपला तरी गुळांबा सैल वाटत राहिला. 🤔
चांगला दाट झाल्यासारखे वाटल्यावर केव्हातरी अंदाजाने मी गॅस बंद केला.
माझा पहिलावहिला गुळांबा गार झाल्यावर खूष होऊन मी बरणीत भरायला घेतला पण त्यात घातलेला डाव पातेले सोडेचना. 🙄
मग मी खाली बसून बरणी घट्ट धरून ठेवली आणि कुठल्यातरी गडबडीत असलेल्या नवर्याला थांबवून त्यांच्या मदतीने पातेल्यातलं मिश्रण त्यात शक्तीनिशी लोटलं.
उरलेलं चाटून पाहिलं तर ते अप्रतिम खमंग लागत होतं.
थोड्या वेळाने नॉर्मल होईल याची उगाचच खात्री होती.
मग ताजं लोणी कढवलं. गरम पोळी पानात घेतली.
आता गुळांबा घेऊन त्यावर साजूक तूप घालून लहानपणापासून प्रिय असलेली चव अनुभवायची होती.
बरणीत चमचा घातला तर तो बिचारा वाकडा झाला पण आतला ऐवज घेऊन बाहेर यायचं नाव घेईना. 🤨
मग मात्र जाड डाव आत खुपसला.
पुन्हा नवर्याला बोलावून बरणी मागच्या बाजूने घट्ट धरून ठेवायला लावली आणि डावभर गुळांबा दोन्ही हातांनी ओढून बाहेर काढला.
चिक्कीकडे झुकलेलं ते प्रकरण लागत बाकी भारी होतं.
दरम्यान एकदा अचानक जेवायला ओळखीच्या एक काकू आल्या.
शेवटी काहीतरी गोड हवं म्हणून ’वाढ गं जरासा गुळांबा वगैरे काहीतरी’ म्हणाल्या. मी भीत भीत वाढला.
त्यांना कवळी असल्याने ती आत बहुतेक गुळांब्यासह खडखडू लागली असावी. गुळांब्याचा नीट आनंद न घेता आल्याने वैतागून
किंवा तो बरणीतून काढण्याची आम्हा ’दोघांची’ सर्कस पाहून
त्यांनी त्याचं नामकरण ’दोन माणसांचा गुळांबा’ असं केलं. 😬
त्या नन्तर एका लग्नात त्या भेटल्या तेव्हा म्हणाल्याच, "झाला की नाही यंदाचा ’दोन माणसांचा गुळांबा’ करून !".
तर दोन नव्हे पण चमच्याने सहज निघणारा ’एका माणसाचा गुळांबा’ करुन झालेला आहे.
फोटोत किंचित सरसरीत वाटत असला तरी निवल्यावर तो अगदी व्यवस्थित झालाय बरं का! 😃
तुमचा झाला का तयार? एका माणसाचा गुळांबा !!