"आपल्याला वस्तूची किंमत चांगली कळते पण कशाचंही मूल्य समजत नाही" असं ऑस्कर वाईल्डने म्हटलय. "किंमत" आणि "मूल्य" यातला फरक न समजणार्यांसाठी असेल, पुण्यातल्या "हॉटेल विश्व" मधे पाण्याच्या पेल्याच्या तळाशी खालच्या बाजूने लिहीलेले असायचे "हा ग्लास हॉटेल विश्व मधून चोरलेला आहे". "चुकून" हा ग्लास कुणी उचलून घरी घेऊन जाण्याच्या भानगडीत पडू नये म्हणून त्या हॉटेल व्यवस्थापनाने ही पुणेरी शक्कल लढवली असावी. एकीकडे या युक्तीची गंमत वाटली पण दुसरीकडे असे लिहावे लागावे याची एक भारतीय म्हणून खंत वाटली. परद्रव्याचा (वस्तूचा) मोह पाप मानणारी हिंदू संकल्पना असो, अस्तेय तत्त्वाचा पुरस्कार करणारे जैन आचारसूत्र असो किंवा "thou shall not steal" सांगणारी बायबलमधील आज्ञा.. सगळ्याचे सार एकच. मात्र बहुसंख्य भारतीयांच्या मनात आदरणीय असलेली "मूल्यं" आणि त्यांची व्यवहारातली "किंमत" यात मात्र प्रचंड तफावत आढळते. भारतात जागोजागी (अगदी धार्मिक स्थळीदेखील) "खिसेकापूंपासून सावध राहा" अशा पाट्या असतात. या सावधगिरीबरोबर एखादा खिसेकापू आपल्याच मनात तर राहत नाही ना याचा आपण शोध घ्यायला हवा आहे.
साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलाला, वर्गमित्राचा पेन त्याने न विचारता "उचलून" आणला म्हणून रागावणारे वडील स्वत: मात्र ऑफीसमधला पेन-स्टेशनरी सर्रास घरी आणत-वापरत असतील तर? मग प्रामाणिकपणाचे संस्कार मुलावर करण्याचा नैतिक हक्क त्यांना आहे? सरकारी कार्यालयांमधल्या वस्तू (वस्तूच नव्हे गाड्या आणि हाताखालची माणसे सुद्धा) "आपुलकीच्या" भावनेने घरी वापरायला-कामाला उचलून आणण्यात काही गैर आहे असे मुळात आपल्याकडे कित्येक सरकारी कर्मचार्यांना वाटत नाही. बर्याच शाळांमधल्या प्रयोगशाळेतला एखादा संगणक, फर्निचर प्राचार्य किंवा इतर अधिकार्यांच्या घरी वापरले जाते. खाजगी कंपन्यांमधे देखील कमी अधिक प्रमाणात "पराया माल अपना" मानण्याच्या घटना घडत असतात. रात्री जास्तीचे सरकारी काम करताना, ते काम पूर्ण होताच सरकारी मेणबत्ती फुंकून टाकायची आणि खाजगी कामासाठी स्वखर्चाने दुसरी मेणबत्ती पेटवायची इतक्या उदात्त पातळीवर पोचलेले मंत्रीगण स्वातंत्र्यानंतर याच देशात होऊन गेले. मात्र आज जनतेच्या विकासकामांचा निधी जिथे कित्येक राजकारणी उचलून नेतात तिथे सामान्य माणसाच्या उचलेगिरीबद्दल काय सांगावे. आपल्या भारतीय रेल्वेमधील डब्यांची अवस्था पाहा. आरसे, दिवे अगदी स्वच्छतागृहातले मग देखील उचलून न्यायचे लोक सोडत नाहीत. बसमधल्या प्रथमोपचार पेट्या गायब होतात. सार्वजनिक पाणपोईवरच्या "साखळदंडांना न जुमानता" पेले काढून नेले जातात. "राष्ट्रीय संपत्तीवर" आपलाही हक्क आहेच अशी त्यामागे "आपलेपणाची" भावना असावी बहुधा. "उचलेगिरी" हा भारतीयांचा फार मोठा अवगुण आहे. याचा अर्थ जगातल्या इतर देशातील सगळे लोक प्रामाणिक आहेत असा नव्हे पण तुलनेने उचलेगिरीत भारतीयांचा क्रमांक बराच वरचा आहे ही शोचनीय वस्तुस्थिती आहे.
गरिबी आणि त्यातून निर्माण होणारी अगतिकता हे याचे कारण असावे असे मुळीच नाही. गरिबी हेच कारण असते तर निदान सुखवस्तू लोकांना उचलेगिरी करायची काय गरज? पण असे होत नाही. परदेशात, विशेषत: युरोप- अमेरिकेत जाऊन आलेले पर्यटक तिकडच्या प्रामाणिकप्रणाची स्तुती करतात. मॉल नसतील तिथे वर्तमानपत्रे, भाजी, फळे किमतीच्या बिल्ल्यासह मांडून ठेवलेली असतात. स्थानिक लोक प्रामाणिकपणे त्या बिल्ल्यावर लिहीलेल्या किंमतीनुसार शेजारी ठेवलेल्या पेटीत पैसे टाकून वस्तू घेऊन निघून जातात. पर्यटन कंपन्यांचा अनुभव असा आहे की परदेशातील अशा घटनांचे कौतुक करताना कित्येक भारतीय पर्यटक नकळत स्वत: करत असलेली उचलेगिरी विसरून जातात. हॉटेलमधल्या टॉवेलपासून शक्य असेल त्यातले बरेच काही ते घरी घेऊन येतात. प्रवासी कंपन्यांकडून फक्त ब्रेकफास्ट-जेवण पुरवले जाते, अधेमधे भूक लागली तर कशाला खर्च करा, म्हणून काही पर्यटक एका वेळी खाऊ शकणार नाही एवढे पदार्थ मागवतात. त्यातून उरलेले वाटेत खायला म्हणून खुशाल रॅप करून हळूच खिशात टाकून नेतात. नायगारा फॉल्स सारख्या जगप्रसिद्ध ठिकाणी पुनर्वापर करता येतील असे रेनकोट्स दिले जातात. ते तिथे नंतर जमा करायचे असतात. काही पर्यटक ते "आठवण"(?) म्हणून घरी घेऊन येतात. कित्येक प्रवासी कंपन्या परदेशात कसे वागावे यासाठी हल्ली प्रवासपूर्व कार्यशाळा घेऊ लागल्या आहेत. पण आपल्याच देशात कसे वागावे याच्या कार्यशाळा कोणी आणि कुठे घ्यायच्या? संत-परंपरा असणार्या, थोर सांस्कृतिक मूल्ये जपणार्या आपल्या देशात ही उचलेगिरीची कीड समाजातल्या सगळ्या स्तरांमधे का झिरपत गेली असावी ?
देशप्रेमाचा आणि सामाजिक शिस्तीचा अभाव हे यामागचे एक महत्वाचे कारण आहे. एवढं चालायचच असा लोकांचा दृष्टीकोन होऊ लागला आहे. जपानमधे त्सुनामी नंतर जो उत्पात झाला तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. साहजिक बिलींग- सुरक्षा यंत्रणा बंद होत्या तरीही मॉल मधून खरेदी करणारे लोक हातातल्या वस्तू जिथल्या तिथे तशाच ठेवून शांतपणे बाहेर पडले. अशी सामाजिक शिस्त आणि सचोटी आपल्यामधे उतरणे फार गरजेचे आहे. सामान्य जनतेचं सोडाच, आपले सांस्कृतिक क्षेत्रही याला याला अपवाद नाही. परदेशी कथानकांची-चित्रपटाची जशीच्या तशी नक्कल करणे हा तर आपला जणू अधिकारच आहे. मग तो शोमन म्हणून नावाजलेल्या राजकपूरचा "चोरी चोरी" असो (त्यांनी तर नावातच कबुली देऊन टाकली) वा संजय भन्सालीचा "ब्लॅक". कधी कधी तर एकाच वेळी दोन संगीतकार एकाच विदेशी गाण्याची चाल उचलतात आणि मूळ चाल (म्हणजे पहिली चोरी) कुणाची यावर वाद घालतात. दुसर्याची कविता आपल्या नावावर खपवण्याचे प्रकार उघडपणे चालतात. एखाद्या शैलीचा-विचारांचा कलाकृतीवर-लेखनावर प्रभाव पडणे, प्रेरणा घेणे हे कलाकारांच्या बाबतीत घडणारच पण एरवी, हे अमुक एका कलाकृतीचे रूपांतर आहे असे स्पष्टपणे मान्य करण्याचा, मूळ निर्मात्याला त्याचे श्रेय देण्याचा मोठेपणा का दाखवला जात नाही? जेथे इतर साहित्यिकांचे वेचे वापरले आहेत तिथे त्यानुसार स्पष्ट उल्लेख असायला हवा. पण लक्षात कोण घेतो? किंवा लक्षात घ्यायचेच असते कुणाला. आत्म्याच्या पारदर्शतेचे दाखले देणार्या अभंगांमधे "तुका म्हणे" "नामा म्हणे" अशी संतांची "स्वाक्षरी" शेवटी असल्याने नाईलाजाने का होईना ते अभंग साहित्यिक खिसेकापूंपासून सुरक्षित राहिले आहेत.
उचलेगिरी ही चोरीच आहे ही जाणीव मुळात मनात भिनली पाहिजे. बर्याचदा "नाहीतरी कुणाला कळतय" म्हणून "कुणी पाहत नाही" म्हणून अशी उचलेगिरी सर्रास केली जाते तेव्हा ही बोधकथा आठवते. एका आश्रमातील शिष्य एका लहानशा पक्ष्याला पकडतो आणि गुरूंना विचारतो "मी याला मारू का? ".गुरू म्हणतात "अवश्य, पण कुणीही ते पाहता कामा नये". शिष्य त्या पक्ष्याला घेऊन निर्जन स्थळी जातो. तो पक्ष्याला मारणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की हा पक्षी पाहतो आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मी" पाहतो आहे. मनोमन गुरूला नमस्कार करून शिष्य त्या पक्ष्याला सोडून देतो. इथे गुरूइतकाच, आत्मज्ञान झालेला शिष्य श्रेष्ट ठरतो. ज्याचे आपण वरवर सुकृती म्हणून समर्थन करतो अशा आपल्या प्रत्येक कृतीकडे, या शिष्यासारखेच आत्मदीप पेटवून, योग्यायोग्यतेचा निकष लावून, आपण "स्वत:" पाहायला हवे.
साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलाला, वर्गमित्राचा पेन त्याने न विचारता "उचलून" आणला म्हणून रागावणारे वडील स्वत: मात्र ऑफीसमधला पेन-स्टेशनरी सर्रास घरी आणत-वापरत असतील तर? मग प्रामाणिकपणाचे संस्कार मुलावर करण्याचा नैतिक हक्क त्यांना आहे? सरकारी कार्यालयांमधल्या वस्तू (वस्तूच नव्हे गाड्या आणि हाताखालची माणसे सुद्धा) "आपुलकीच्या" भावनेने घरी वापरायला-कामाला उचलून आणण्यात काही गैर आहे असे मुळात आपल्याकडे कित्येक सरकारी कर्मचार्यांना वाटत नाही. बर्याच शाळांमधल्या प्रयोगशाळेतला एखादा संगणक, फर्निचर प्राचार्य किंवा इतर अधिकार्यांच्या घरी वापरले जाते. खाजगी कंपन्यांमधे देखील कमी अधिक प्रमाणात "पराया माल अपना" मानण्याच्या घटना घडत असतात. रात्री जास्तीचे सरकारी काम करताना, ते काम पूर्ण होताच सरकारी मेणबत्ती फुंकून टाकायची आणि खाजगी कामासाठी स्वखर्चाने दुसरी मेणबत्ती पेटवायची इतक्या उदात्त पातळीवर पोचलेले मंत्रीगण स्वातंत्र्यानंतर याच देशात होऊन गेले. मात्र आज जनतेच्या विकासकामांचा निधी जिथे कित्येक राजकारणी उचलून नेतात तिथे सामान्य माणसाच्या उचलेगिरीबद्दल काय सांगावे. आपल्या भारतीय रेल्वेमधील डब्यांची अवस्था पाहा. आरसे, दिवे अगदी स्वच्छतागृहातले मग देखील उचलून न्यायचे लोक सोडत नाहीत. बसमधल्या प्रथमोपचार पेट्या गायब होतात. सार्वजनिक पाणपोईवरच्या "साखळदंडांना न जुमानता" पेले काढून नेले जातात. "राष्ट्रीय संपत्तीवर" आपलाही हक्क आहेच अशी त्यामागे "आपलेपणाची" भावना असावी बहुधा. "उचलेगिरी" हा भारतीयांचा फार मोठा अवगुण आहे. याचा अर्थ जगातल्या इतर देशातील सगळे लोक प्रामाणिक आहेत असा नव्हे पण तुलनेने उचलेगिरीत भारतीयांचा क्रमांक बराच वरचा आहे ही शोचनीय वस्तुस्थिती आहे.
गरिबी आणि त्यातून निर्माण होणारी अगतिकता हे याचे कारण असावे असे मुळीच नाही. गरिबी हेच कारण असते तर निदान सुखवस्तू लोकांना उचलेगिरी करायची काय गरज? पण असे होत नाही. परदेशात, विशेषत: युरोप- अमेरिकेत जाऊन आलेले पर्यटक तिकडच्या प्रामाणिकप्रणाची स्तुती करतात. मॉल नसतील तिथे वर्तमानपत्रे, भाजी, फळे किमतीच्या बिल्ल्यासह मांडून ठेवलेली असतात. स्थानिक लोक प्रामाणिकपणे त्या बिल्ल्यावर लिहीलेल्या किंमतीनुसार शेजारी ठेवलेल्या पेटीत पैसे टाकून वस्तू घेऊन निघून जातात. पर्यटन कंपन्यांचा अनुभव असा आहे की परदेशातील अशा घटनांचे कौतुक करताना कित्येक भारतीय पर्यटक नकळत स्वत: करत असलेली उचलेगिरी विसरून जातात. हॉटेलमधल्या टॉवेलपासून शक्य असेल त्यातले बरेच काही ते घरी घेऊन येतात. प्रवासी कंपन्यांकडून फक्त ब्रेकफास्ट-जेवण पुरवले जाते, अधेमधे भूक लागली तर कशाला खर्च करा, म्हणून काही पर्यटक एका वेळी खाऊ शकणार नाही एवढे पदार्थ मागवतात. त्यातून उरलेले वाटेत खायला म्हणून खुशाल रॅप करून हळूच खिशात टाकून नेतात. नायगारा फॉल्स सारख्या जगप्रसिद्ध ठिकाणी पुनर्वापर करता येतील असे रेनकोट्स दिले जातात. ते तिथे नंतर जमा करायचे असतात. काही पर्यटक ते "आठवण"(?) म्हणून घरी घेऊन येतात. कित्येक प्रवासी कंपन्या परदेशात कसे वागावे यासाठी हल्ली प्रवासपूर्व कार्यशाळा घेऊ लागल्या आहेत. पण आपल्याच देशात कसे वागावे याच्या कार्यशाळा कोणी आणि कुठे घ्यायच्या? संत-परंपरा असणार्या, थोर सांस्कृतिक मूल्ये जपणार्या आपल्या देशात ही उचलेगिरीची कीड समाजातल्या सगळ्या स्तरांमधे का झिरपत गेली असावी ?
देशप्रेमाचा आणि सामाजिक शिस्तीचा अभाव हे यामागचे एक महत्वाचे कारण आहे. एवढं चालायचच असा लोकांचा दृष्टीकोन होऊ लागला आहे. जपानमधे त्सुनामी नंतर जो उत्पात झाला तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. साहजिक बिलींग- सुरक्षा यंत्रणा बंद होत्या तरीही मॉल मधून खरेदी करणारे लोक हातातल्या वस्तू जिथल्या तिथे तशाच ठेवून शांतपणे बाहेर पडले. अशी सामाजिक शिस्त आणि सचोटी आपल्यामधे उतरणे फार गरजेचे आहे. सामान्य जनतेचं सोडाच, आपले सांस्कृतिक क्षेत्रही याला याला अपवाद नाही. परदेशी कथानकांची-चित्रपटाची जशीच्या तशी नक्कल करणे हा तर आपला जणू अधिकारच आहे. मग तो शोमन म्हणून नावाजलेल्या राजकपूरचा "चोरी चोरी" असो (त्यांनी तर नावातच कबुली देऊन टाकली) वा संजय भन्सालीचा "ब्लॅक". कधी कधी तर एकाच वेळी दोन संगीतकार एकाच विदेशी गाण्याची चाल उचलतात आणि मूळ चाल (म्हणजे पहिली चोरी) कुणाची यावर वाद घालतात. दुसर्याची कविता आपल्या नावावर खपवण्याचे प्रकार उघडपणे चालतात. एखाद्या शैलीचा-विचारांचा कलाकृतीवर-लेखनावर प्रभाव पडणे, प्रेरणा घेणे हे कलाकारांच्या बाबतीत घडणारच पण एरवी, हे अमुक एका कलाकृतीचे रूपांतर आहे असे स्पष्टपणे मान्य करण्याचा, मूळ निर्मात्याला त्याचे श्रेय देण्याचा मोठेपणा का दाखवला जात नाही? जेथे इतर साहित्यिकांचे वेचे वापरले आहेत तिथे त्यानुसार स्पष्ट उल्लेख असायला हवा. पण लक्षात कोण घेतो? किंवा लक्षात घ्यायचेच असते कुणाला. आत्म्याच्या पारदर्शतेचे दाखले देणार्या अभंगांमधे "तुका म्हणे" "नामा म्हणे" अशी संतांची "स्वाक्षरी" शेवटी असल्याने नाईलाजाने का होईना ते अभंग साहित्यिक खिसेकापूंपासून सुरक्षित राहिले आहेत.
उचलेगिरी ही चोरीच आहे ही जाणीव मुळात मनात भिनली पाहिजे. बर्याचदा "नाहीतरी कुणाला कळतय" म्हणून "कुणी पाहत नाही" म्हणून अशी उचलेगिरी सर्रास केली जाते तेव्हा ही बोधकथा आठवते. एका आश्रमातील शिष्य एका लहानशा पक्ष्याला पकडतो आणि गुरूंना विचारतो "मी याला मारू का? ".गुरू म्हणतात "अवश्य, पण कुणीही ते पाहता कामा नये". शिष्य त्या पक्ष्याला घेऊन निर्जन स्थळी जातो. तो पक्ष्याला मारणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की हा पक्षी पाहतो आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मी" पाहतो आहे. मनोमन गुरूला नमस्कार करून शिष्य त्या पक्ष्याला सोडून देतो. इथे गुरूइतकाच, आत्मज्ञान झालेला शिष्य श्रेष्ट ठरतो. ज्याचे आपण वरवर सुकृती म्हणून समर्थन करतो अशा आपल्या प्रत्येक कृतीकडे, या शिष्यासारखेच आत्मदीप पेटवून, योग्यायोग्यतेचा निकष लावून, आपण "स्वत:" पाहायला हवे.