‘टू बीएचकेचा थर्ड फ्लोरचा फ्लॅट बुक केलाय, बाल्कनीतून इतका क्लासिक व्ह्यू दिसतो.’
‘सगळं मिक्स करून त्याचे बॉल्स ब्रेडक्रम्समध्ये रोल करून डीप फ्राय करायचे आणि सॉसबरोबर सर्व्ह करायचं.’
‘स्ट्रेट ये, मग लेफ्ट टर्न घे, प्रिन्सेस ब्यूटिपार्लरचा बोर्ड दिसेल, जस्ट साइडची बिल्डींग.’
‘माय गॉड, मंथ एंडला एग्झाम आहे, मग सिलॅबस केव्हा कम्प्लीट करणार?’
मराठीचा वापर आपण हा असा, फक्त क्रियापदांपुरता करत असू तर हे प्रकरण गंभीर आहे. अशा भाषेचा आपल्याला अभिमान वाटेल तरी कसा! मराठी भाषा दिन ‘साजरा’ करायचाय तो आपल्याला आपल्या भाषिक भरकटलेपणाचे भान यावे म्हणून. जागतिकीकरणाच्या झंझावातात आपले ‘My मराठी’ कडे नकळत वाहत चाललेले तारू पुन्हा ‘माय-मराठी’च्या किनाऱ्याला लागावे म्हणून...
उदा: त्यासाठी सर्वप्रथम बोलताना, लिहिताना शक्य असेल तिथे चांगल्या आणि सोप्या मराठी शब्दांचा वापर करायचा...जग जवळ आलेय ते तंत्रज्ञानामुळे, बरेचसे तंत्रज्ञान आले ते विदेशातून ,साहजिकच त्यांचे शब्द आपल्याला स्वीकारावे लागले. तांत्रिक शब्दांना काही वेळेस पर्यायी शब्द चपखल बसत नसतील आणि वापरण्याचा अट्टाहास केला तर ते विनोदी वाटतात, उदा: सॉफ्टवेअर ला ’मृदु प्रणाली’, हार्डवेअर ला ’कठीण प्रणाली’..कुणाला समजणारेय ही किचकट ’प्रणाली’..असे काही अपवाद सोडले तर नेमके प्रतिशब्द वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे अवघड नाही. अनावश्यक जागी इंग्रजी शब्द आपण का पेरतो? शब्द आठवत नाहीत म्हणून रूळलेले इंग्रजी शब्द पटकन बोलले जातात, काही जणांना तर मराठी शब्द आठवत नाहीत याचा चक्क अभिमान वाटतो. कॉम्प्युटर 'शटडाऊन कर’ याऐवजी ’बंद कर’, ’फॅन ऑन कर’ला ’पंखा सुरू कर’ असं म्हणता येतं ना!
एखाद्या ’प्ले ग्रुप’ म्हणजेच शिशुवर्गात शिकणार्या लहानशा पियूकडे बघा. पियूच्या बाबांचं पाहुण्यांसमोर प्रात्यक्षिक सुरू होतं. "मून कुठे अश्तो?" पियू आकाशाकडे बोट दाखवत ’अप’ म्हणते. त्यावर खूष होऊन तिला खाऊ देत आई म्हणते."‘वेली गुड आणि स्टार्स कसे करतात?" पियू बोबड्या स्वरात म्हणते, "टिंकल टिंकल." असे पियू किंवा राजू मोठे होतात तेव्हा एक धेडगुजरी व्यक्तिमत्त्व तयार होतं. त्यांची मराठी मातॄभाषा तर असते पण त्या भाषेचे ज्ञान मात्र जुजबी असते. ’मोर थुईथुई म्हणजे आनंदाने नाचतो’ असे त्यांना सांगितले तर ते ’मी थुईथुई हसतो’ असा वाक्यात उपयोग करू शकतात. यावर कपाळाला हात लावण्यापेक्षा मुलांवर इंग्लीश बरोबरच उत्तम मराठीचे संस्कार घरातून व्हायला हवेत आणि त्यासाठी मुळात आपली भाषा, आपलं वाचन सकस असायला हवं याची जाणीव पालकांना आहे का?
पर्यटन करून आल्यावर विशेषत: दक्षिण भारतातून किंवा परदेशातून आलेल्यांना जाणवतं की, भाषेचा दुराभिमान गैरसोयीचा देखील ठरतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे अनेक भाषा अवगत असलेल्या लोकांना विशेष संधी आणि प्राधान्य दिलं जाते. बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व वैश्विक संवाद यासाठी इतर संपर्कभाषा शिकायलाच हव्यात. मात्र आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व्यवहार होतात ते मातृभाषेत..मराठीत .आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब जगात उमटवणे हे यापुढले आव्हान आहे. यासाठी मराठीतले उत्तम साहित्य अनुवादाद्वारे जगभर पोचवता येणे शक्य आहे. मराठी साहित्य संमेलनातील राजकारणामुळे अशा संमेलनांकडे रसिक पाठ फिरवू लागले आहेत. मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असणे हेच या समस्यांवर उत्तर आहे मात्र वाचनसंस्कृती जोपासल्याशिवाय हे शक्य नाही. वाचू आनंदे, लिहावे नेटके यासारखी पुस्तके, उत्तम मराठी बालसाहित्य मुलांसाठी उपलब्ध आहे. त्याची गोडी मुलांना लागावी ही पालकांची जबाबदारी आहे.
हे सगळं ठीक आहे पण या समस्येचे मूळ इंग्लीश माध्यमात आहे ना मग सरळ मातृभाषेतूनच शिक्षण घ्या ना, अशी आग्रही भूमिका स्वत:ची नातवंडे इंग्लीश माध्यमात घातलेले अनेक जण मांडतात. मुद्दा ठसवण्य़ासाठी मातृभाषेतून शिकून यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली जातात. जात्याच हुशार मुलांचे यश शिक्षणाच्या माध्यमावर अवलंबून नसते पण सर्वसामान्य मुलांना मराठी माध्यमातून शिकून पुढे इंग्लीशमधे उच्चशिक्षण घेणे अतिशय जड जाते. शिवाय काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे, त्यामुळे सेमी-इंग्लीशचा सुवर्णमध्य अधिक सयुक्तिक नाही का! इंग्लीश भाषेमुळे मराठीला दुय्यम मानले जाते आहे अशी निरर्थक ओरड करण्यापेक्षा बहुभाषक होण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, हे आता तरी आपण मान्य केले पाहिजे.
‘इंग्लीशच्या अतिक्रमणाला उत्तर म्हणून मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे’ हे हल्लीचे सर्वाधिक लोकप्रिय घोषवाक्य आहे. विशेषत: राजकीय भाषणात वापरण्याचे. मातृभाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करणाऱ्या युरोपातील काही राष्ट्रांची उदाहरणं यासंदर्भात दिली जातात. मुळात ती राष्ट्रे लोकसंख्येचा विचार करता जेमतेम आपल्या मुंबई इतकी असतात. भारतात अठरापगड भाषा आहेत.समजा उद्या उच्चशिक्षण मराठीतून उपलब्ध झाले आणि ती तांत्रिक अर्थाने ज्ञानभाषा झाली असे आपण गृहीत धरले तरीही मराठी माध्यमातून डॉक्टर झालेली व्यक्ती परराज्यात कसे काम करू शकेल? परराज्यात शिक्षक म्हणून कसे शिकवू शकेल?
इंग्रजीच्या अपरिहार्यतेमुळे किंवा समाजाने केलेल्या तिच्या व्यापक स्वीकारामुळे आधुनिक व्यवहार मराठी किंवा एकूणच भारतीय भाषांमधे होणे शक्य नसेल तर त्यांच्या संवर्धनाचा आव आणण्यापेक्षा त्यांचे जतन करण्यावर अधिक भर द्यायला हवा. हे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे, परंतु स्पर्धेच्या भीतीने त्यांचा रस अर्थकारणात अधिक आहे, साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी क्रिकेट सामन्याचं समालोचन (म्हणजे आजच्या मराठीत ’कॉमेंट्री’ बरं का!) आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचं. त्यामुळे चौकार, षटकार, शतक, धावचीत, झेल, बळी, सामनावीर असे किती तरी सोपे मराठी प्रतिशब्द सहजपणे रुळले. आता मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांची नावे ’ग्रेट भेट, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, लिटिल चॅम्प्स, रिपोर्ताज, ग्रँड फिनाले’ अशी असतात. मराठी माध्यमांनी आज ही जबाबदारी नाकारली तर त्यात त्यांचेही नुकसान आहे. 'भारतीय विमानपत्तन प्राधिकरण’ अशी पाटी वाचल्यावर डोक्यात काही तरी प्रकाश पडेल का! भाषेची क्लीष्टता हे सामान्य माणूस तिच्यापासून दुरावण्याचे एक कारण मानले जाते. ग्रामीण मराठीचा ठसका आणि गोडवा खरं तर वेगळाच, शिवाय आता मराठीची अनेक रूपे साहित्यातून मांडली गेली आहेत. तरीही भाषेची दुर्बोधता आणि नागरी व ग्रामीण मराठी असा भेद दुरावा वाढवतो.
काही राजकीय पक्षांनी मराठीतून पाटया लावणे अनिवार्य केले, मात्र त्या पाट्या लिपीने देवनागरी झाल्या, अर्थाने मराठी झाल्या नाहीत.रिटेल शोरूम, जनरल स्टोअर्स, हायस्कूल, हेअर कटींग सलून, मेडीकल्स हे शब्द तसेच रूढ झाले आहेत फक्त ते देवनागरीतून लिहीले गेले इतकच. आचार्य अत्र्यांची मराठी सोपी असूनही त्यांच्या साहित्यिक दर्जाला उणेपणा आला नाही, उलट तेच त्यांचे वैशिष्ट्य ठरले. संस्कृतप्रचुर मराठीपेक्षा ती जितकी साधी, सुगम होत जाईल तितकीच व्यापकतेने स्वीकारली जाईल. स्वा. सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना उदा: महापौर, चित्रपट, नगरपालिका, क्रीडांगण असे सुटसुटीत मराठी स्वरूप दिले आहे. याचा वापर होत गेला आणि ते रूढ झाले. मराठी भाषेचे असे सुलभीकरणच तिला सर्वसमावेशक करू शकेल.. आपल्यावर जबाबदारी आहे ती अशा आणखी नव्या शब्दांना प्रचारात आणण्याची...
त्या त्या वेळचे प्रचलित शब्द सामावून घेत भाषा प्रवाही होते त्यामुळे ज्या परभाषेतील शब्दांना सोपे प्रतिशब्द नाहीत ते तसेच ठेवून मराठीत त्यांचे विलीनीकरण व्हावे. किमान व्यवहारात तरी मराठीला मानाचे स्थान देणे आपल्या हातात आहे .मराठी जतन करण्यासाठी ती वाचत राहणं, ऐकत राहणं, बोलत राहणं एवढं तर आपण नक्कीच करु शकतो नं! जी मराठी भाषा आपल्याला ओळख देते, तिचा आदर करायलाच हवा. मराठी मातीचा सुगंध, मराठी लोकजीवनाचा, भावबंधांचा, उत्तम साहित्याचा आनंद आपण अनुभवू शकतो तो या भाषेमुळेच. मराठीचं अस्तित्व हेच आपलं सुद्धा अस्तित्व आहे. मराठी भाषेसोबत मराठी संस्कृतीची नाळ जुळलेली आहे. ती जगणं सुंदर करण्यासाठी आहे, हे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अधोरेखित व्हावं. त्यासाठी मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान नको, मराठीवर नितांत प्रेम असायला हवं.
---
मराठी दिना निमित्त दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेला लेख
https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mohini-mahesh-modak-article-about-globalisation-and-marathi-language-5538242-NOR.html
‘सगळं मिक्स करून त्याचे बॉल्स ब्रेडक्रम्समध्ये रोल करून डीप फ्राय करायचे आणि सॉसबरोबर सर्व्ह करायचं.’
‘स्ट्रेट ये, मग लेफ्ट टर्न घे, प्रिन्सेस ब्यूटिपार्लरचा बोर्ड दिसेल, जस्ट साइडची बिल्डींग.’
‘माय गॉड, मंथ एंडला एग्झाम आहे, मग सिलॅबस केव्हा कम्प्लीट करणार?’
मराठीचा वापर आपण हा असा, फक्त क्रियापदांपुरता करत असू तर हे प्रकरण गंभीर आहे. अशा भाषेचा आपल्याला अभिमान वाटेल तरी कसा! मराठी भाषा दिन ‘साजरा’ करायचाय तो आपल्याला आपल्या भाषिक भरकटलेपणाचे भान यावे म्हणून. जागतिकीकरणाच्या झंझावातात आपले ‘My मराठी’ कडे नकळत वाहत चाललेले तारू पुन्हा ‘माय-मराठी’च्या किनाऱ्याला लागावे म्हणून...
उदा: त्यासाठी सर्वप्रथम बोलताना, लिहिताना शक्य असेल तिथे चांगल्या आणि सोप्या मराठी शब्दांचा वापर करायचा...जग जवळ आलेय ते तंत्रज्ञानामुळे, बरेचसे तंत्रज्ञान आले ते विदेशातून ,साहजिकच त्यांचे शब्द आपल्याला स्वीकारावे लागले. तांत्रिक शब्दांना काही वेळेस पर्यायी शब्द चपखल बसत नसतील आणि वापरण्याचा अट्टाहास केला तर ते विनोदी वाटतात, उदा: सॉफ्टवेअर ला ’मृदु प्रणाली’, हार्डवेअर ला ’कठीण प्रणाली’..कुणाला समजणारेय ही किचकट ’प्रणाली’..असे काही अपवाद सोडले तर नेमके प्रतिशब्द वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे अवघड नाही. अनावश्यक जागी इंग्रजी शब्द आपण का पेरतो? शब्द आठवत नाहीत म्हणून रूळलेले इंग्रजी शब्द पटकन बोलले जातात, काही जणांना तर मराठी शब्द आठवत नाहीत याचा चक्क अभिमान वाटतो. कॉम्प्युटर 'शटडाऊन कर’ याऐवजी ’बंद कर’, ’फॅन ऑन कर’ला ’पंखा सुरू कर’ असं म्हणता येतं ना!
एखाद्या ’प्ले ग्रुप’ म्हणजेच शिशुवर्गात शिकणार्या लहानशा पियूकडे बघा. पियूच्या बाबांचं पाहुण्यांसमोर प्रात्यक्षिक सुरू होतं. "मून कुठे अश्तो?" पियू आकाशाकडे बोट दाखवत ’अप’ म्हणते. त्यावर खूष होऊन तिला खाऊ देत आई म्हणते."‘वेली गुड आणि स्टार्स कसे करतात?" पियू बोबड्या स्वरात म्हणते, "टिंकल टिंकल." असे पियू किंवा राजू मोठे होतात तेव्हा एक धेडगुजरी व्यक्तिमत्त्व तयार होतं. त्यांची मराठी मातॄभाषा तर असते पण त्या भाषेचे ज्ञान मात्र जुजबी असते. ’मोर थुईथुई म्हणजे आनंदाने नाचतो’ असे त्यांना सांगितले तर ते ’मी थुईथुई हसतो’ असा वाक्यात उपयोग करू शकतात. यावर कपाळाला हात लावण्यापेक्षा मुलांवर इंग्लीश बरोबरच उत्तम मराठीचे संस्कार घरातून व्हायला हवेत आणि त्यासाठी मुळात आपली भाषा, आपलं वाचन सकस असायला हवं याची जाणीव पालकांना आहे का?
पर्यटन करून आल्यावर विशेषत: दक्षिण भारतातून किंवा परदेशातून आलेल्यांना जाणवतं की, भाषेचा दुराभिमान गैरसोयीचा देखील ठरतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे अनेक भाषा अवगत असलेल्या लोकांना विशेष संधी आणि प्राधान्य दिलं जाते. बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व वैश्विक संवाद यासाठी इतर संपर्कभाषा शिकायलाच हव्यात. मात्र आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व्यवहार होतात ते मातृभाषेत..मराठीत .आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब जगात उमटवणे हे यापुढले आव्हान आहे. यासाठी मराठीतले उत्तम साहित्य अनुवादाद्वारे जगभर पोचवता येणे शक्य आहे. मराठी साहित्य संमेलनातील राजकारणामुळे अशा संमेलनांकडे रसिक पाठ फिरवू लागले आहेत. मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असणे हेच या समस्यांवर उत्तर आहे मात्र वाचनसंस्कृती जोपासल्याशिवाय हे शक्य नाही. वाचू आनंदे, लिहावे नेटके यासारखी पुस्तके, उत्तम मराठी बालसाहित्य मुलांसाठी उपलब्ध आहे. त्याची गोडी मुलांना लागावी ही पालकांची जबाबदारी आहे.
हे सगळं ठीक आहे पण या समस्येचे मूळ इंग्लीश माध्यमात आहे ना मग सरळ मातृभाषेतूनच शिक्षण घ्या ना, अशी आग्रही भूमिका स्वत:ची नातवंडे इंग्लीश माध्यमात घातलेले अनेक जण मांडतात. मुद्दा ठसवण्य़ासाठी मातृभाषेतून शिकून यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली जातात. जात्याच हुशार मुलांचे यश शिक्षणाच्या माध्यमावर अवलंबून नसते पण सर्वसामान्य मुलांना मराठी माध्यमातून शिकून पुढे इंग्लीशमधे उच्चशिक्षण घेणे अतिशय जड जाते. शिवाय काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे, त्यामुळे सेमी-इंग्लीशचा सुवर्णमध्य अधिक सयुक्तिक नाही का! इंग्लीश भाषेमुळे मराठीला दुय्यम मानले जाते आहे अशी निरर्थक ओरड करण्यापेक्षा बहुभाषक होण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, हे आता तरी आपण मान्य केले पाहिजे.
‘इंग्लीशच्या अतिक्रमणाला उत्तर म्हणून मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे’ हे हल्लीचे सर्वाधिक लोकप्रिय घोषवाक्य आहे. विशेषत: राजकीय भाषणात वापरण्याचे. मातृभाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करणाऱ्या युरोपातील काही राष्ट्रांची उदाहरणं यासंदर्भात दिली जातात. मुळात ती राष्ट्रे लोकसंख्येचा विचार करता जेमतेम आपल्या मुंबई इतकी असतात. भारतात अठरापगड भाषा आहेत.समजा उद्या उच्चशिक्षण मराठीतून उपलब्ध झाले आणि ती तांत्रिक अर्थाने ज्ञानभाषा झाली असे आपण गृहीत धरले तरीही मराठी माध्यमातून डॉक्टर झालेली व्यक्ती परराज्यात कसे काम करू शकेल? परराज्यात शिक्षक म्हणून कसे शिकवू शकेल?
इंग्रजीच्या अपरिहार्यतेमुळे किंवा समाजाने केलेल्या तिच्या व्यापक स्वीकारामुळे आधुनिक व्यवहार मराठी किंवा एकूणच भारतीय भाषांमधे होणे शक्य नसेल तर त्यांच्या संवर्धनाचा आव आणण्यापेक्षा त्यांचे जतन करण्यावर अधिक भर द्यायला हवा. हे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे, परंतु स्पर्धेच्या भीतीने त्यांचा रस अर्थकारणात अधिक आहे, साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी क्रिकेट सामन्याचं समालोचन (म्हणजे आजच्या मराठीत ’कॉमेंट्री’ बरं का!) आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचं. त्यामुळे चौकार, षटकार, शतक, धावचीत, झेल, बळी, सामनावीर असे किती तरी सोपे मराठी प्रतिशब्द सहजपणे रुळले. आता मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांची नावे ’ग्रेट भेट, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, लिटिल चॅम्प्स, रिपोर्ताज, ग्रँड फिनाले’ अशी असतात. मराठी माध्यमांनी आज ही जबाबदारी नाकारली तर त्यात त्यांचेही नुकसान आहे. 'भारतीय विमानपत्तन प्राधिकरण’ अशी पाटी वाचल्यावर डोक्यात काही तरी प्रकाश पडेल का! भाषेची क्लीष्टता हे सामान्य माणूस तिच्यापासून दुरावण्याचे एक कारण मानले जाते. ग्रामीण मराठीचा ठसका आणि गोडवा खरं तर वेगळाच, शिवाय आता मराठीची अनेक रूपे साहित्यातून मांडली गेली आहेत. तरीही भाषेची दुर्बोधता आणि नागरी व ग्रामीण मराठी असा भेद दुरावा वाढवतो.
काही राजकीय पक्षांनी मराठीतून पाटया लावणे अनिवार्य केले, मात्र त्या पाट्या लिपीने देवनागरी झाल्या, अर्थाने मराठी झाल्या नाहीत.रिटेल शोरूम, जनरल स्टोअर्स, हायस्कूल, हेअर कटींग सलून, मेडीकल्स हे शब्द तसेच रूढ झाले आहेत फक्त ते देवनागरीतून लिहीले गेले इतकच. आचार्य अत्र्यांची मराठी सोपी असूनही त्यांच्या साहित्यिक दर्जाला उणेपणा आला नाही, उलट तेच त्यांचे वैशिष्ट्य ठरले. संस्कृतप्रचुर मराठीपेक्षा ती जितकी साधी, सुगम होत जाईल तितकीच व्यापकतेने स्वीकारली जाईल. स्वा. सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना उदा: महापौर, चित्रपट, नगरपालिका, क्रीडांगण असे सुटसुटीत मराठी स्वरूप दिले आहे. याचा वापर होत गेला आणि ते रूढ झाले. मराठी भाषेचे असे सुलभीकरणच तिला सर्वसमावेशक करू शकेल.. आपल्यावर जबाबदारी आहे ती अशा आणखी नव्या शब्दांना प्रचारात आणण्याची...
त्या त्या वेळचे प्रचलित शब्द सामावून घेत भाषा प्रवाही होते त्यामुळे ज्या परभाषेतील शब्दांना सोपे प्रतिशब्द नाहीत ते तसेच ठेवून मराठीत त्यांचे विलीनीकरण व्हावे. किमान व्यवहारात तरी मराठीला मानाचे स्थान देणे आपल्या हातात आहे .मराठी जतन करण्यासाठी ती वाचत राहणं, ऐकत राहणं, बोलत राहणं एवढं तर आपण नक्कीच करु शकतो नं! जी मराठी भाषा आपल्याला ओळख देते, तिचा आदर करायलाच हवा. मराठी मातीचा सुगंध, मराठी लोकजीवनाचा, भावबंधांचा, उत्तम साहित्याचा आनंद आपण अनुभवू शकतो तो या भाषेमुळेच. मराठीचं अस्तित्व हेच आपलं सुद्धा अस्तित्व आहे. मराठी भाषेसोबत मराठी संस्कृतीची नाळ जुळलेली आहे. ती जगणं सुंदर करण्यासाठी आहे, हे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अधोरेखित व्हावं. त्यासाठी मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान नको, मराठीवर नितांत प्रेम असायला हवं.
---
मराठी दिना निमित्त दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेला लेख
https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mohini-mahesh-modak-article-about-globalisation-and-marathi-language-5538242-NOR.html