नक्षलवाद्यांचा उर्फ माओवाद्यांचा हैदोस वाढत चालला आहे. प्रशासकीय अधिकार्यांचे अपहरण, अपहॄत सरपंचाची हत्या, नागरिकांना धमक्या, सुरूंगस्फोट... ज्या व्यवस्थेशी त्यांनी युद्ध पुकारले आहे त्या व्यवस्थेशी पोटापाण्यासाठी जुळलेल्या सर्वसामान्य पोलिस शिपायांना आपले लक्ष्य करून नक्षलवादी काय मिळवणार आहेत? त्यांचे समांतर सरकार खरोखर शोषितांना न्याय मिळवून देईल? आणि त्यांचे तथाकथित शोषणमुक्त सरकार चालवणार कोण? माणसेच ना? माणूस आहे तिथे अहंकार आहे, स्पर्धा आहे आणि संघर्षही आहे. वरवर पाहता "नक्षलवाद" किंवा ज्या पायावर तो उभा आहे तो "साम्यवाद", या विचारपद्धती अगदी आदर्शवादी, मानवतावादी वाटतात पण प्रत्यक्षात जुने "मालक" जाऊन नवे येतात इतकेच.
साम्यवादाच्या नावाखाली मानवतेशी चाललेल्या अजब खेळाचे उपहासात्मक चित्रण म्हणजे जॉर्ज ऑरवेल यांनी लिहीलेले "ऍनिमल फार्म " हे पुस्तक.(ऑरवेलचा जन्म ब्रिटीशकालीन भारतातल्या बिहारमधला). दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान लिहीलेल्या या रुपकात्मक कथेत ऑरवेलने (रशियन राज्यक्रांतीनंतरच्या) साम्यवादाची लक्तरे जितक्या सहजतेने टांगली आहेत तितक्याच सहजतेने सत्ता आणि भ्रष्टाचार यांच्यामधील अपरिहार्य नात्याचे चित्रण ही केले आहे. ही प्रतीके आजच्या नक्षलवादी चळवळीलाही चपखल लागू पडतात.
इसाप किंवा पंचतंत्र या बोधकथांमधले बोलणारे प्राणी आपल्याला माहीत आहेत. त्याच धर्तीवर हे पुस्तक आपल्याला परिकथेतून नकळत वास्तवात घेऊन येतं.
"जोन्स फार्म" चा ताबा चक्क त्या फार्ममधील प्राणी घेतात आणि मग जे काही घडत जातं त्याची ही सुरस हकीकत! ("प्राण्यांचा बदला" नावाची एक गमतीदार इ-मेल आठवतेय इथे...एक उंदीर संगणकासमोर बसलाय आणि "ह्यूमन पॅड" ("माऊसपॅड प्रमाणे) वर आडवा धरून एका माणसाला तो गरागर फिरवतोय. सगळे झेब्रा "ह्यूमन क्रॉसींग" (झेब्रा कॉसींग प्रमाणे) म्हणजे मानवाकृती पट्ट्यांवरून रस्ता ओलांडतायेत किंवा डुकरांची पिले "ह्यूमन बॅंक" (पिगी बॅंक प्रमाणे) मधे मानवाच्या डोक्यातील खाचेतून पैसे टाकत आहेत.) जोन्स फार्ममधले नेते झालेले प्राणी क्रांती ,क्रांती म्हणत माणसातले अवगुण शिकतात. ते प्राण्यांचे "पशु" कसे बनतात याचं चित्रण म्हणजे ऍनीमल फार्म..
"सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी हे इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत" अशा खोचक वाक्यातून ऑरवेलने साम्यवादाला चिमटा काढला आहे.झारच्या क्रूर राजवटीचे प्रतीक म्हणजे फार्मचा मालक जोन्स हा माणूस. झारपासून लोकांची सुटका होऊन न्यायाचे राज्य निर्माण व्हावे म्हणून खरं तर १९१७ मधे रशियन राज्यक्रांती झाली. कथेच्या सुरुवातीला माणसाची सत्ता उलथून प्राण्यांनी फार्म ताब्यात का घेतले यामागची भूमिका मेजर नावाचे डुक्कर विषद करते. हे भाषण म्हणजे अगदी कार्ल मार्क्स आणि व्लादिमीर लेनिन यांच्या विचारांचीच अभिव्यक्ती आहे. संपत्ती व कामाचे, समान वाटप हे साम्यवादाचे मुलभूत तत्त्व रुजवण्याचा या मागे हेतू असतो.(चारू मुजुमदारांनी नक्षलबाडी इथे सुरू केलेल्या चळवळीचा मूळ हेतू असाच होता). "’द्विपाद माणसे मुर्दाबाद, चतुष्पाद प्राणी झिंदाबाद" असे नवे घोषवाक्य तयार होते. लेनिनप्रमाणे मेजरचाही कथेच्या सुरूवातीलाच अंत होतो. यानंतर नेपोलियन (स्टॅलिनचे प्रतीक) आणि स्नोबॉल (ट्रॉट्स्की चे प्रतीक) या दोन डुकरांकडे नेतृत्व जाते आणि सत्तेच्या अहंकारातून त्यांच्यात बेबनाव सुरू होतो.
समान न्यायाची स्वप्ने दाखवून क्रांती करून फार्म ताब्यात घेतले जाते खरे पण परिस्थिती आधीपेक्षाही वाईट होते. कमअस्सल दर्ज्याच्या प्राण्यांच्या नशिबी आलेली वेठबिगारी काही सुटत नाही..जोन्स या माणसाच्या जागी प्राण्यांमधलेच शक्तीमान, उद्दाम प्राणी सत्तेवर येतात. या नवीन सत्ताधार्यांचा प्रवास देखील भ्रष्टाचाराच्या दिशेनेच होऊ लागतो. क्रांतीच्या मूळ उद्देशाला तडा जातो आहे हे इतर भाबड्या प्राण्यांना कळतही नाही. काही प्राणी गोंधळलेल्या मनःस्थितीतच जगत राहतात. साम्यवादाच्या नावाखाली नीरस, कळकट, ध्येयशून्य आयुष्य जगावे की कष्ट कमी करणारी तांत्रिक उपकरणे वापरून प्रगतीची, विकासाची रंगीत स्वप्ने पाहावीत अशी त्यांची द्विधा अवस्था होते. नक्षलवादाच्या भोवर्यात सापडलेल्या तरूणांची अवस्था काहीशी अशीच आहे.
अखेर एक दिवस या सामान्य प्राण्यांचे डोळे उघडतात....(जुन्या मालकाच्या जागी आलेली) डुकरे चक्क दोन पायांवर माणसासारखी चालताना त्यांना दिसतात. घोषवाक्यात "चतुष्पाद उत्तम मात्र द्विपाद सर्वोत्तम" असा बदल होतो. या सगळ्या बदलांप्रित्यर्थ जंगी मेजवानीचा बेत होतो..त्यात शेजारच्या फार्मच्या "मानवी" मालकांनाही खास आमंत्रण असतं. लेखक ऑरवेल शेवटी म्हणतो.."मेजवानीतल्या त्या हास्यकल्लोळात, डुकरांचे आणि माणसांचे आवाज सारखेच वाटू लागले.. कोण डुक्कर आहे आणि कोण माणूस हे ओळखणे आधीच कठीण झाले होते पण आता तर ते अशक्य झाले होते."
बाकीचे साधे सरळ गरीब प्राणी एकेकाळी त्यांच्यापैकीच एक असणार्या या मगरूर प्राण्यांच हे वर्तन (की परिवर्तन!) हतबलपणे पाहत राहतात..
साम्यवादाचा अतिरेक शोषणमुक्तीकडे, समानतेकडे नव्हे तर नव्या वर्चस्ववादाकडे आणि अखेर विघटनाकडे जातो (१९९० च्या सुमारास अखेर रशियाचे विघटन झाले, याचे भाकीत जणू काही ऑरवेलने पन्नास वर्षे आधीच करून ठेवले होते.) नक्षलवादी क्रांती करू पाहणार्यांना भविष्याचा आरसा दाखवणारे हे पुस्तक आहे. समानतेच्या नावाखाली जन्मत: वेगवेगळी असणारी माणसाची नैसर्गिक उद्यमशीलता कशी दडपता येऊ शकेल? आजचे माओवादी नेते उद्या श्रेणीविरहीत रचना जपतील- त्यांच्यात सत्तेची आकांक्षा कधीच निर्माण होणार नाही-सगळीकडे आबादीआबाद होईल, अशा भ्रामक कल्पनेतून हे तथाकथित क्रांतीकारक वेळीच भानावर आले नाही तर चुकलेल्या वाटेवर सैरभैरपणे भटकत राहणे एवढेच त्यांच्या हातात उरेल. हीच अवस्था नारायण सुर्वेंच्या "सांग" कवितेत चित्रीत झाली आहे........
"आपलेच घर जेव्हा आपणाशी वैर धरते, अशा वेळी हे हृदया कठे जावे ते सांग..
मालवले जातात दिवे एकापाठोपाठ एक , कोठून आणाव्या ज्योती हे हृदया तेवढे सांग...
धक्के मारून काढावा बिर्हाडातील भाडेकरू, अशी दैना का गा सांग..."
ऑरवेलने ’ऍनिमल फार्म’ पुस्तकातून हा इशारा तब्बल ८० वर्षापूर्वीच दिला आहे...
साम्यवादाच्या नावाखाली मानवतेशी चाललेल्या अजब खेळाचे उपहासात्मक चित्रण म्हणजे जॉर्ज ऑरवेल यांनी लिहीलेले "ऍनिमल फार्म " हे पुस्तक.(ऑरवेलचा जन्म ब्रिटीशकालीन भारतातल्या बिहारमधला). दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान लिहीलेल्या या रुपकात्मक कथेत ऑरवेलने (रशियन राज्यक्रांतीनंतरच्या) साम्यवादाची लक्तरे जितक्या सहजतेने टांगली आहेत तितक्याच सहजतेने सत्ता आणि भ्रष्टाचार यांच्यामधील अपरिहार्य नात्याचे चित्रण ही केले आहे. ही प्रतीके आजच्या नक्षलवादी चळवळीलाही चपखल लागू पडतात.
इसाप किंवा पंचतंत्र या बोधकथांमधले बोलणारे प्राणी आपल्याला माहीत आहेत. त्याच धर्तीवर हे पुस्तक आपल्याला परिकथेतून नकळत वास्तवात घेऊन येतं.
"जोन्स फार्म" चा ताबा चक्क त्या फार्ममधील प्राणी घेतात आणि मग जे काही घडत जातं त्याची ही सुरस हकीकत! ("प्राण्यांचा बदला" नावाची एक गमतीदार इ-मेल आठवतेय इथे...एक उंदीर संगणकासमोर बसलाय आणि "ह्यूमन पॅड" ("माऊसपॅड प्रमाणे) वर आडवा धरून एका माणसाला तो गरागर फिरवतोय. सगळे झेब्रा "ह्यूमन क्रॉसींग" (झेब्रा कॉसींग प्रमाणे) म्हणजे मानवाकृती पट्ट्यांवरून रस्ता ओलांडतायेत किंवा डुकरांची पिले "ह्यूमन बॅंक" (पिगी बॅंक प्रमाणे) मधे मानवाच्या डोक्यातील खाचेतून पैसे टाकत आहेत.) जोन्स फार्ममधले नेते झालेले प्राणी क्रांती ,क्रांती म्हणत माणसातले अवगुण शिकतात. ते प्राण्यांचे "पशु" कसे बनतात याचं चित्रण म्हणजे ऍनीमल फार्म..
"सर्व प्राणी समान आहेत, पण काही प्राणी हे इतर प्राण्यांपेक्षा जास्त समान आहेत" अशा खोचक वाक्यातून ऑरवेलने साम्यवादाला चिमटा काढला आहे.झारच्या क्रूर राजवटीचे प्रतीक म्हणजे फार्मचा मालक जोन्स हा माणूस. झारपासून लोकांची सुटका होऊन न्यायाचे राज्य निर्माण व्हावे म्हणून खरं तर १९१७ मधे रशियन राज्यक्रांती झाली. कथेच्या सुरुवातीला माणसाची सत्ता उलथून प्राण्यांनी फार्म ताब्यात का घेतले यामागची भूमिका मेजर नावाचे डुक्कर विषद करते. हे भाषण म्हणजे अगदी कार्ल मार्क्स आणि व्लादिमीर लेनिन यांच्या विचारांचीच अभिव्यक्ती आहे. संपत्ती व कामाचे, समान वाटप हे साम्यवादाचे मुलभूत तत्त्व रुजवण्याचा या मागे हेतू असतो.(चारू मुजुमदारांनी नक्षलबाडी इथे सुरू केलेल्या चळवळीचा मूळ हेतू असाच होता). "’द्विपाद माणसे मुर्दाबाद, चतुष्पाद प्राणी झिंदाबाद" असे नवे घोषवाक्य तयार होते. लेनिनप्रमाणे मेजरचाही कथेच्या सुरूवातीलाच अंत होतो. यानंतर नेपोलियन (स्टॅलिनचे प्रतीक) आणि स्नोबॉल (ट्रॉट्स्की चे प्रतीक) या दोन डुकरांकडे नेतृत्व जाते आणि सत्तेच्या अहंकारातून त्यांच्यात बेबनाव सुरू होतो.
समान न्यायाची स्वप्ने दाखवून क्रांती करून फार्म ताब्यात घेतले जाते खरे पण परिस्थिती आधीपेक्षाही वाईट होते. कमअस्सल दर्ज्याच्या प्राण्यांच्या नशिबी आलेली वेठबिगारी काही सुटत नाही..जोन्स या माणसाच्या जागी प्राण्यांमधलेच शक्तीमान, उद्दाम प्राणी सत्तेवर येतात. या नवीन सत्ताधार्यांचा प्रवास देखील भ्रष्टाचाराच्या दिशेनेच होऊ लागतो. क्रांतीच्या मूळ उद्देशाला तडा जातो आहे हे इतर भाबड्या प्राण्यांना कळतही नाही. काही प्राणी गोंधळलेल्या मनःस्थितीतच जगत राहतात. साम्यवादाच्या नावाखाली नीरस, कळकट, ध्येयशून्य आयुष्य जगावे की कष्ट कमी करणारी तांत्रिक उपकरणे वापरून प्रगतीची, विकासाची रंगीत स्वप्ने पाहावीत अशी त्यांची द्विधा अवस्था होते. नक्षलवादाच्या भोवर्यात सापडलेल्या तरूणांची अवस्था काहीशी अशीच आहे.
अखेर एक दिवस या सामान्य प्राण्यांचे डोळे उघडतात....(जुन्या मालकाच्या जागी आलेली) डुकरे चक्क दोन पायांवर माणसासारखी चालताना त्यांना दिसतात. घोषवाक्यात "चतुष्पाद उत्तम मात्र द्विपाद सर्वोत्तम" असा बदल होतो. या सगळ्या बदलांप्रित्यर्थ जंगी मेजवानीचा बेत होतो..त्यात शेजारच्या फार्मच्या "मानवी" मालकांनाही खास आमंत्रण असतं. लेखक ऑरवेल शेवटी म्हणतो.."मेजवानीतल्या त्या हास्यकल्लोळात, डुकरांचे आणि माणसांचे आवाज सारखेच वाटू लागले.. कोण डुक्कर आहे आणि कोण माणूस हे ओळखणे आधीच कठीण झाले होते पण आता तर ते अशक्य झाले होते."
बाकीचे साधे सरळ गरीब प्राणी एकेकाळी त्यांच्यापैकीच एक असणार्या या मगरूर प्राण्यांच हे वर्तन (की परिवर्तन!) हतबलपणे पाहत राहतात..
साम्यवादाचा अतिरेक शोषणमुक्तीकडे, समानतेकडे नव्हे तर नव्या वर्चस्ववादाकडे आणि अखेर विघटनाकडे जातो (१९९० च्या सुमारास अखेर रशियाचे विघटन झाले, याचे भाकीत जणू काही ऑरवेलने पन्नास वर्षे आधीच करून ठेवले होते.) नक्षलवादी क्रांती करू पाहणार्यांना भविष्याचा आरसा दाखवणारे हे पुस्तक आहे. समानतेच्या नावाखाली जन्मत: वेगवेगळी असणारी माणसाची नैसर्गिक उद्यमशीलता कशी दडपता येऊ शकेल? आजचे माओवादी नेते उद्या श्रेणीविरहीत रचना जपतील- त्यांच्यात सत्तेची आकांक्षा कधीच निर्माण होणार नाही-सगळीकडे आबादीआबाद होईल, अशा भ्रामक कल्पनेतून हे तथाकथित क्रांतीकारक वेळीच भानावर आले नाही तर चुकलेल्या वाटेवर सैरभैरपणे भटकत राहणे एवढेच त्यांच्या हातात उरेल. हीच अवस्था नारायण सुर्वेंच्या "सांग" कवितेत चित्रीत झाली आहे........
"आपलेच घर जेव्हा आपणाशी वैर धरते, अशा वेळी हे हृदया कठे जावे ते सांग..
मालवले जातात दिवे एकापाठोपाठ एक , कोठून आणाव्या ज्योती हे हृदया तेवढे सांग...
धक्के मारून काढावा बिर्हाडातील भाडेकरू, अशी दैना का गा सांग..."
ऑरवेलने ’ऍनिमल फार्म’ पुस्तकातून हा इशारा तब्बल ८० वर्षापूर्वीच दिला आहे...