दर सेकंदाला केस सारखे करत ’यू नो’ न म्हणणारी
सुरेख नैसर्गिक अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी आणि शब्दांवर मनापासून प्रेम करणारी गोड मराठी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. #SpruhaJoshi
’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या तरुण भारत मधील स्तंभातला लेख #स्पृहाजोशीच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगबद्दल ...

’ब्लॉग ’ती’ चा’ #HerBlog या तरुण भारत मधील स्तंभातला लेख #स्पृहाजोशीच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगबद्दल ...
"एखादी कलाकृती श्रेष्ठ तेव्हा ठरते, जेव्हा तिचा आस्वाद घेतल्यानंतर कित्येक दिवसांनीसुद्धा ती आपला पाठलाग करत राहते. मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी जागा शोधून बसून राहते ठाण मांडून.." स्पृहा जोशी ही देखणी, संवेदनशील अभिनेत्री उत्तम कलाकृतीची इतकी नेमकी व्याख्या स्वत:च्या ब्लॉगवर शब्दबद्ध करते तेव्हा आश्चर्य वाटत नाही. सिनेमा, नाटकाच्या मुखवट्यांच्या दुनियेतही ती कधी कचकड्य़ाची, नटवी बाहुली वाटली नाही. तिची भूमिका लहान असो वा मोठी ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन जाते हे नक्की. ती शब्दवेडी आहे. शब्दांची खोलवर समज असल्याने सहजपणे उमलत जाणारा नैसर्गिक अभिनय हा तिचा ’एक्स फॅक्टर’ आहे. साहजिकच ती सोशल मिडियावर सर्वाधिक चाहते असणारी मराठी अभिनेत्री आहे. ’कानगोष्टी’ म्हणजेच kangoshti.blogspot.in हा तिचा ब्लॉग तिच्यासारखाच तरल. ’काही मनातलं.. मनापासून सांगावसं.. हळुवार काहीतरी.. भिजलेलं पाखरू जसं..’ असं म्हणत उत्कटपणे संवाद साधणारा.
‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेमधली स्वप्नाळू कुहू, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मधली नितळ मनाची ईशा किंवा ‘उंच माझा झोका’ मधल्या ध्येयवादी रमाबाई रानडे, कोणतीही भूमिका असो, आचरट सासू सून मालिका आणि त्यातल्या बेगडी कलाकारांच्या तुलनेत स्पृहा कायम खरी वाटत आली, लक्षणीय ठरली. तिचं ’समुद्र’ नाटक गाजलं. नुकतेच ’मोरया’ आणि ’मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हे सिनेमे आले. दरम्यान विवाह झाला. वैयक्तिक जीवन, करियरमधली स्पर्धा या सगळ्य़ा आघाड्या ती कशी सांभाळत असावी याचं चाहत्यांना कुतूहल असतं. याचं परिपक्व उत्तर तिच्या ब्लॉगवरच्या ताज्या मुलाखतीत सापडतं. ती म्हणते, "अभिनयक्षेत्राचं क्षणभंगुरत्व काम करताना सतत जाणवत राहतं. कधी वैफल्याचे, उद्विग्नतेचे क्षण येतात. कधी ‘सीन’ गणिक भावनांचे ‘ऑन–ऑफ’ करताना, कधी घर आणि करिअर याचा तोल साधताना तर कधी आमचं माणूसपण व आमचं अभिनेत्री असणं यात फरक न करता येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा भार सोसताना सगळंच असह्य होत जातं. याचा निचरा होण्याची तीव्र गरज जाणवते .. तेव्हा माझी कविता मला साथ देते. मी कवितेतूनच मन मोकळं करते."
कविता हा तिचा श्वास आहे. स्पृहाचे ’लोपामुद्रा’ आणि ’चांदणचुरा’ हे कवितासंग्रह म्हणजे तिची खरी ओळख आहेत. "देहाचेच आता जाहले मंदिर..आतला अंधार लोपलासे.." असे तिचे लखलखणारे शब्द याची अनुभूती देतात. कधी ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या एका कवितेत ती नुसत्या शब्दांनी पाऊस उभा करते.
"झाडं मोहरली, वेली बावरल्या, थंड हवेची झुळूक
मातीचं महागडं अत्तर.. खुळ्यासारखं जगभर उधळून गेली !
आकाशात अचानक वेगळेच रंग आले. पाण्याला रंग नसतो खरंतर;
पण पावसाला मात्र असतो.. हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग.."
तर कधी ती.. "कोणी जीव उधळते, धावे मृगजळा पाठी; कळ विरहाची सोसे, एक कासावीस मिठी.. !" असं काही लिहून जाते आणि ते वाचताना तिचं आणि कवितेचं गहिरं नातं उलगडत जातं.
कविता हा तिचा श्वास आहे. स्पृहाचे ’लोपामुद्रा’ आणि ’चांदणचुरा’ हे कवितासंग्रह म्हणजे तिची खरी ओळख आहेत. "देहाचेच आता जाहले मंदिर..आतला अंधार लोपलासे.." असे तिचे लखलखणारे शब्द याची अनुभूती देतात. कधी ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या एका कवितेत ती नुसत्या शब्दांनी पाऊस उभा करते.
"झाडं मोहरली, वेली बावरल्या, थंड हवेची झुळूक
मातीचं महागडं अत्तर.. खुळ्यासारखं जगभर उधळून गेली !
आकाशात अचानक वेगळेच रंग आले. पाण्याला रंग नसतो खरंतर;
पण पावसाला मात्र असतो.. हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग.."
तर कधी ती.. "कोणी जीव उधळते, धावे मृगजळा पाठी; कळ विरहाची सोसे, एक कासावीस मिठी.. !" असं काही लिहून जाते आणि ते वाचताना तिचं आणि कवितेचं गहिरं नातं उलगडत जातं.
कवयित्रीने भाबडं असलं पाहिजे असं मात्र नाही. अभिनयासारख्या क्षेत्रात अनुभवाची व्यापकता वाढत गेली तसतशा अनेक नव्या गोष्टी तिच्या निरिक्षणाच्या कवेत येऊ लागल्याचं ब्लॉगवरच्या काही लेखांमधून जाणवतं. स्पृहाला आवडलेल्या पुस्तकांपासून विद्याबाईंसारख्या व्यक्तींपर्यंत, शहरात बोकाळलेल्या मॉल संस्कृतीपासून मराठी सिनेमातंत्रात होत गेलेल्या सकारात्मक बदलापर्यंत अनेक नोंदी तिच्या ’कानगोष्टी’ ब्लॉगवर आढळतात. कुमार गंधर्वांसारख्या कलाकाराचं ती ’आपल्या साधनेने, तपस्येने, निर्गुणाच्या डोहाचाही तळ गाठू शकणारा, काळाच्या पुढचा कलाकार’ असं विलक्षण वर्णन करते.
मुंबईतली बकाल गर्दी आणि ’सवाई गंधर्व’ला लाभलेली दर्दींची गर्दी यांची तुलना करताना लिहीते, "पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण नुकताच गर्दी सुंदर कशी दिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं."
पं. नेहरुंनी त्यांच्या सखीला लिहीलेल्या पत्रांचं संकलन वाचत असताना त्यात ’उन्मुक्त अभिव्यक्ती, सडेतोड आत्मपरीक्षण, वेदनांची हळुवार उकल आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण’ हे सारं गवसत गेल्याचं ती लिहीते. हेच सारं तिच्या ब्लॉगमध्येही अधूनमधून सापडतं.
मात्र तिच्या रुंदावलेल्या परिघाबरोबर अद्याप अनेक गोष्टी ताकदीने ब्लॉगवर यायला हव्या आहेत हे देखील जाणवतं. अभिनेत्री म्हणून तिच्यात होत गेलेले बदल, तिचं ग्लॅमरक्षेत्राचं बदलत गेलेलं आकलन, पटकथेपासून सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंतच्या किंवा नाटक रंगमंचावर येण्यापर्यंतच्या प्रवासातले खाचखळगे, दोन्ही माध्यमातला फरक, भेटलेल्या वल्ली, आभासी व प्रत्यक्ष जगातल्या चाहत्यांचे अनुभव, मराठी वर्तुळाबाहेरचं सिनेनाट्य क्षेत्र असे एक ना अनेक विषय तिच्या शैलीतून या ब्लॉगवर आले तर तो मराठी ब्लॉगविश्वातला मैलाचा दगड ठरेल. स्पृहा हे करु शकते कारण शब्द, माध्यम आणि कला याची तिहेरी जाण असलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी ती एक आहे.
मुंबईतली बकाल गर्दी आणि ’सवाई गंधर्व’ला लाभलेली दर्दींची गर्दी यांची तुलना करताना लिहीते, "पायात पाय गुंतलेल्या असंख्य मुंग्या आपल्या अंगावर चालून येतायत.. त्यांच्या असंख्य नजरांचे असंख्य काटे आपल्याला रक्तबंबाळ करत चिरडून टाकतील.. त्यांच्या अगम्य वेगात आपण सुकलेल्या पानासारखे दूर कुठेतरी फरफटत जाऊ असं वाटायला लागतं.. पण नुकताच गर्दी सुंदर कशी दिसू शकते असा एक नवा साक्षात्कार झालाय मला. शंकर महादेवन यांचं गायन झालं आणि ओसंडून वाहणारी १२ हजार माणसं जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करत त्या गुणी कलाकाराला दाद देण्यासाठी उभी राहिली; तेव्हा अंगावर सर्रकन काटा आला माझ्या.. त्या क्षणी ती गर्दी नव्हती... ते 'एक' चैतन्य होतं."
पं. नेहरुंनी त्यांच्या सखीला लिहीलेल्या पत्रांचं संकलन वाचत असताना त्यात ’उन्मुक्त अभिव्यक्ती, सडेतोड आत्मपरीक्षण, वेदनांची हळुवार उकल आणि समोरच्याच्या साथीने आपल्या स्वतःलाच सापडलेले आपण’ हे सारं गवसत गेल्याचं ती लिहीते. हेच सारं तिच्या ब्लॉगमध्येही अधूनमधून सापडतं.
मात्र तिच्या रुंदावलेल्या परिघाबरोबर अद्याप अनेक गोष्टी ताकदीने ब्लॉगवर यायला हव्या आहेत हे देखील जाणवतं. अभिनेत्री म्हणून तिच्यात होत गेलेले बदल, तिचं ग्लॅमरक्षेत्राचं बदलत गेलेलं आकलन, पटकथेपासून सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंतच्या किंवा नाटक रंगमंचावर येण्यापर्यंतच्या प्रवासातले खाचखळगे, दोन्ही माध्यमातला फरक, भेटलेल्या वल्ली, आभासी व प्रत्यक्ष जगातल्या चाहत्यांचे अनुभव, मराठी वर्तुळाबाहेरचं सिनेनाट्य क्षेत्र असे एक ना अनेक विषय तिच्या शैलीतून या ब्लॉगवर आले तर तो मराठी ब्लॉगविश्वातला मैलाचा दगड ठरेल. स्पृहा हे करु शकते कारण शब्द, माध्यम आणि कला याची तिहेरी जाण असलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी ती एक आहे.
स्पृहा प्रांजळ आहे आणि मिश्कील देखील. स्वत:सह अनेकांच्या मनातली गणित विषयाबाबतची नावड सहजपणे उघड करत ती एका लेखात लिहिते, "ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्याविषयी कधीही दु:खी होऊ नये... या वाक्याचा तात्त्विक अर्थ तेव्हा कळला नसला तरी गणिताच्या संदर्भात मात्र तो सुविचार मला फिट्ट पटला होता. त्या गणिताशी आता तसा काही संबंध नाही.. पण नात्यांमधली प्रमेय, आयुष्यातली कठीण गणितं सोडवायला वरच्या सुविचाराचा फॉर्म्युला मला करेक्ट कळून आलाय!!" स्पृहा एक व्यक्ती आणि अभिनेत्री म्हणून प्रगल्भ आहे, यामागे कदाचित हेच सूत्र असावं.
राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या ’बालश्री’ पासून सुरु झालेला तिचा प्रवास अनेक नामांकनं आणि पुरस्कारांच्या साक्षीने पुढे सुरु आहे. चंदेरी दुनियेच्या झगमगाटात राहूनही वास्तवाचं भान राखत होत असलेली तिची दमदार वाटचाल तिच्या ’कानगोष्टी’ या ब्लॉगवरच्या अपडेट्स मधून उमटत राहायला हवी ही अपेक्षा आहे. अर्थात यश म्हणजे फक्त अमुक तमुक अवॉर्ड समारंभात मिळालेल्या बाहुल्या नव्हे, हे
’जपून आहे मीही अजुनी माझ्यामधली तीच बाहुली !’
असं लिहीणार्या मनस्वी स्पृहाला नीटच माहीत आहे. म्हणून वपुंचा दाखला देत ब्लॉगवर व्यक्त होताना ती म्हणते. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करत जगायचं असतं."
’जपून आहे मीही अजुनी माझ्यामधली तीच बाहुली !’
असं लिहीणार्या मनस्वी स्पृहाला नीटच माहीत आहे. म्हणून वपुंचा दाखला देत ब्लॉगवर व्यक्त होताना ती म्हणते. "नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात.. आपल्यावर त्यांचं छत आहे या आनंदात विहार करत जगायचं असतं."
No comments:
Post a Comment